LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचा सामना हा आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना. लखनऊ सूपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात हा सामना रंगणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे उद्याचा सामना त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता असणार आहे. अगोदरच सामन्यात लखनऊने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला त्यामुळे त्याचे मनोबल नक्कीच उंचावले आहे. मिचेल मार्शने तडाखेबाज फलंदाजी करून शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला, तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ४२ धावांनी पराभव केला.


आज बंगळूरुचा संघ नक्कीच जिंकण्यासाठी मैदानात उत्तरेल. गुण तक्त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु तिसऱ्या स्थानावर आहे, पण अव्वल स्थान गाठायचे असेल तर आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. लखनऊ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सहजा सहजी हार मानणारा संघ नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला गोलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल.


यश दयाल व लुंगी एनगीडी यांना चेंडूचा टप्पा अचूक ठेवावा लागेल. मिचेल मार्श फॉर्ममध्ये असल्यामुळे सुरुवातीच्या षटकात हाणामारी होऊ शकते. तसेच फलंदाजीमध्ये मयंक अग्रवाल आणि पाटीदार यांना मधल्या फळीत चांगली फलंदाजी करावी लागेल. रिषभ पंतसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना आहे, एक मोठी खेळी करून तो शेवट गोड करू शकतो. चला तर जाणून घेऊयात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु अव्वल ठरते की लखनऊ शेवट गोड करते।

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)