LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचा सामना हा आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना. लखनऊ सूपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात हा सामना रंगणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे उद्याचा सामना त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता असणार आहे. अगोदरच सामन्यात लखनऊने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला त्यामुळे त्याचे मनोबल नक्कीच उंचावले आहे. मिचेल मार्शने तडाखेबाज फलंदाजी करून शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला, तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ४२ धावांनी पराभव केला.


आज बंगळूरुचा संघ नक्कीच जिंकण्यासाठी मैदानात उत्तरेल. गुण तक्त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु तिसऱ्या स्थानावर आहे, पण अव्वल स्थान गाठायचे असेल तर आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. लखनऊ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सहजा सहजी हार मानणारा संघ नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला गोलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल.


यश दयाल व लुंगी एनगीडी यांना चेंडूचा टप्पा अचूक ठेवावा लागेल. मिचेल मार्श फॉर्ममध्ये असल्यामुळे सुरुवातीच्या षटकात हाणामारी होऊ शकते. तसेच फलंदाजीमध्ये मयंक अग्रवाल आणि पाटीदार यांना मधल्या फळीत चांगली फलंदाजी करावी लागेल. रिषभ पंतसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना आहे, एक मोठी खेळी करून तो शेवट गोड करू शकतो. चला तर जाणून घेऊयात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु अव्वल ठरते की लखनऊ शेवट गोड करते।

Comments
Add Comment

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला.

BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला बढती

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला (लेडी

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला