LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

  59

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचा सामना हा आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना. लखनऊ सूपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात हा सामना रंगणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे उद्याचा सामना त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता असणार आहे. अगोदरच सामन्यात लखनऊने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला त्यामुळे त्याचे मनोबल नक्कीच उंचावले आहे. मिचेल मार्शने तडाखेबाज फलंदाजी करून शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला, तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ४२ धावांनी पराभव केला.


आज बंगळूरुचा संघ नक्कीच जिंकण्यासाठी मैदानात उत्तरेल. गुण तक्त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु तिसऱ्या स्थानावर आहे, पण अव्वल स्थान गाठायचे असेल तर आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. लखनऊ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सहजा सहजी हार मानणारा संघ नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला गोलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल.


यश दयाल व लुंगी एनगीडी यांना चेंडूचा टप्पा अचूक ठेवावा लागेल. मिचेल मार्श फॉर्ममध्ये असल्यामुळे सुरुवातीच्या षटकात हाणामारी होऊ शकते. तसेच फलंदाजीमध्ये मयंक अग्रवाल आणि पाटीदार यांना मधल्या फळीत चांगली फलंदाजी करावी लागेल. रिषभ पंतसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना आहे, एक मोठी खेळी करून तो शेवट गोड करू शकतो. चला तर जाणून घेऊयात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु अव्वल ठरते की लखनऊ शेवट गोड करते।

Comments
Add Comment

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर