LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचा सामना हा आयपीएल २०२५ साखळीतील शेवटचा सामना. लखनऊ सूपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात हा सामना रंगणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे उद्याचा सामना त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता असणार आहे. अगोदरच सामन्यात लखनऊने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला त्यामुळे त्याचे मनोबल नक्कीच उंचावले आहे. मिचेल मार्शने तडाखेबाज फलंदाजी करून शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला, तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ४२ धावांनी पराभव केला.


आज बंगळूरुचा संघ नक्कीच जिंकण्यासाठी मैदानात उत्तरेल. गुण तक्त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु तिसऱ्या स्थानावर आहे, पण अव्वल स्थान गाठायचे असेल तर आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. लखनऊ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सहजा सहजी हार मानणारा संघ नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला गोलंदाजीवर मेहनत घ्यावी लागेल.


यश दयाल व लुंगी एनगीडी यांना चेंडूचा टप्पा अचूक ठेवावा लागेल. मिचेल मार्श फॉर्ममध्ये असल्यामुळे सुरुवातीच्या षटकात हाणामारी होऊ शकते. तसेच फलंदाजीमध्ये मयंक अग्रवाल आणि पाटीदार यांना मधल्या फळीत चांगली फलंदाजी करावी लागेल. रिषभ पंतसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना आहे, एक मोठी खेळी करून तो शेवट गोड करू शकतो. चला तर जाणून घेऊयात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु अव्वल ठरते की लखनऊ शेवट गोड करते।

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक