LSG vs RCB, IPL 2025: जितेश शर्माची बेधडक खेळी, आरसीबी टॉप २मध्ये

  103

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या शेवटच्या साखळी सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपरजायंट्सला ६ विकेटनी हरवत पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. आरसीबीच्या विजयात जितेश शर्माची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने ८५ धावांची बेधडक खेळी केल्याने आरसीबाला हा विजय साकारता आला. लखनऊने आरसीबाला विजयासाठी २२८ धावांचे आव्हान दिले होते. आरसीबीने हे आव्हान ६विकेट राखत पूर्ण केले आणि अव्वल स्थान मिळवले.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी केली. यावेळेस पंतने ठोकलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१७ धावा केल्या आहेत.

पंतने आरसीबीविरुद्ध नाबाद ११८ धावा तडकावल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर लखनऊला २२७ धावांचा डोंगर उभारता आला.

लखनऊची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर मिचेल मार्शने ६७ धावा ठोकल्या. मॅथ्यू ब्रीट्झ्केने १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या पंतने फटकेबाजी करायला सुरूवात केली. त्याने ६१ बॉलमध्ये ११८ धावांची खेळी केली.

संपूर्ण हंगामात लखनऊचा पंत फॉर्ममध्ये दिसत नव्हता. मात्र आज त्याची लय काही वेगळीच आहे. त्याने १०व्या षटकांत २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यासोबतच लखनऊची धावसंख्या १०० पार पोहोचवली. त्यानंतर १४व्या षटकांत मिचेल मार्शने ३१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. हे त्याचे या हंगामातील सहावे अर्धशतक होते. ऋषभ पंतने १८व्या षटकांत ५४ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर लखनऊची धावसंख्या २०० पार पोहोचली.
Comments
Add Comment

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर