मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

शेतीसह अलिबाग शहरही पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकुण सरासरी सरासरी १६०.४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग शहर समुद्रकिनारी असल्याने आणि दुसरीकडे समुद्राला मोठी भरती असल्याने अलिबाग शहरातील रस्ते, भाजी बाजारपेठ, पीएनपी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चेंढरे बायपास, अलिबाग ते पिंपळभाट दरम्यानचा रस्ता, शहरातील नाले, चेंढरे हद्दीतील नाले दुथडी भरून वाहताना दिसून येत होते. दुसरीकडे अलिबाग शहरासह जवळील चेंढरे हद्दीतील नाल्यांची व्यवस्थित सफाई न झाल्याने पाण्याबरोबरच नाल्यांतील कचरा रस्त्यांवर वाहून आल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्डे न भरले गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा विविध प्रकारच्या वाहन चालकांना त्रास सुरु झाल्याचे चित्र दिसून येत होते.



जिल्ह्यात पंचनामा करण्याचे काम सुरू


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहत आहेत. दुसरीकडे गेल्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरे, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्रीसह गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एकूण १३ कच्च्या घरांचे, २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन आरोग्य केंद्र, दोन स्मशानभूमी, एक मच्छिमार सोसायटी एक पोल्ट्री व इतर पाच सार्वजनिक मालमत्तांचे समावेश आहे.



तालुक्यांमध्ये पावसाची नोंद


अलिबागला २४१, मुरुडला २५१, पेणला १६०, पनवेलला २४५.२, उरणला १००, कर्जतला १०३, खालापुरला १२३, माथेरानला १५२, सुधागडला १०२, माणगावला १३६, तळा १७४, महाडला ७८, पोलादपूरला ११८, श्रीवर्धनला १७०, म्हसळ्याला २८२, रोह्याला १३२ असा एकूण २५६७.२ मिलीमीटर (सरासरी १६०.४५) पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या