मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

शेतीसह अलिबाग शहरही पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकुण सरासरी सरासरी १६०.४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग शहर समुद्रकिनारी असल्याने आणि दुसरीकडे समुद्राला मोठी भरती असल्याने अलिबाग शहरातील रस्ते, भाजी बाजारपेठ, पीएनपी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चेंढरे बायपास, अलिबाग ते पिंपळभाट दरम्यानचा रस्ता, शहरातील नाले, चेंढरे हद्दीतील नाले दुथडी भरून वाहताना दिसून येत होते. दुसरीकडे अलिबाग शहरासह जवळील चेंढरे हद्दीतील नाल्यांची व्यवस्थित सफाई न झाल्याने पाण्याबरोबरच नाल्यांतील कचरा रस्त्यांवर वाहून आल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्डे न भरले गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा विविध प्रकारच्या वाहन चालकांना त्रास सुरु झाल्याचे चित्र दिसून येत होते.



जिल्ह्यात पंचनामा करण्याचे काम सुरू


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहत आहेत. दुसरीकडे गेल्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरे, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्रीसह गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एकूण १३ कच्च्या घरांचे, २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन आरोग्य केंद्र, दोन स्मशानभूमी, एक मच्छिमार सोसायटी एक पोल्ट्री व इतर पाच सार्वजनिक मालमत्तांचे समावेश आहे.



तालुक्यांमध्ये पावसाची नोंद


अलिबागला २४१, मुरुडला २५१, पेणला १६०, पनवेलला २४५.२, उरणला १००, कर्जतला १०३, खालापुरला १२३, माथेरानला १५२, सुधागडला १०२, माणगावला १३६, तळा १७४, महाडला ७८, पोलादपूरला ११८, श्रीवर्धनला १७०, म्हसळ्याला २८२, रोह्याला १३२ असा एकूण २५६७.२ मिलीमीटर (सरासरी १६०.४५) पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी