भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश


मुंबई : भाडेतत्त्वावरील ५१५० इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून, या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. ते सोमवारी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.


मंत्री सरनाईक म्हणाले, २२ मेपर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु, या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. सध्या महामंडळाला बसण्याची अत्यंत आवश्यकता असताना संबंधित संस्था जर वेळेत बस पुरवठा करू शकत नसेल तर या कंपनी सोबत केलेला निविदा करार रद्द करावा.



सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्या-टप्प्याने पुनर्बाधणी करून त्याचे रुपांतर हिरकणी (निम आराम) बसेसमध्ये करण्यात यावे. तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.



स्वच्छतेबाबत तडजोड नाही


मंत्री म्हणून राज्यातील विविध बसस्थानकाला भेट दिली असता, स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. या संदर्भात प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणे अपेक्षित असताना अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा सज्जड दम या वेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

Comments
Add Comment

मुंबईचा ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून बंद; वाहतुकीचा नवा मार्ग जाहीर

मुंबई : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणाऱ्या एल्फिन्स्टन ब्रिज अर्थात

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अजूनही पोहोचेना औषधे

जूनमध्ये प्रस्ताव मंजूर, तरीही पुरवठा नाही मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील मोफत

विरोध डावलून सात वर्षांपूर्वीच बांधलेला उड्डाणपूल पाडण्यास बीएमसीची मंजूरी

मुंबई: बीएमसीने गोरेगावमधील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल पाडण्यासाठी तत्त्वतः परवानगी दिली आहे. सात

खूशखबर! मुंबईतील तलावांमध्ये ९८ टक्के जलसाठा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी पातळी ९८

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार

मुंबई : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन

राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व