पावसाचा फटका रेल्वे वाहतूक कोलमडली, रस्ते वाहतूक मंदावली, अंधेरी सब वे बंद

  66

मुंबई : मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला फटका बसला. एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात संथ गतीने झाली. सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सब वे पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रुळ गायब झाले. रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. ऑफिसला जात असलेले अनेकजण पावसामुळे ठिकठिकाणी अडकले आहेत. मिळेल त्या वाहनाने पुढे प्रवास करुन जात आहेत.

मध्य रेल्वेच्या मशिद बंदर तसेच चुनाभट्टी आणि सायन या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक पुरती कोलमडली आहे.

केईएम रुग्णालयाच्या आवारातही पाणी साचले आहे. गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, वडाळा उड्डाणपुलाखालील भाग, हिंदमाता येथे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.

भरती आली असल्यामुळे उंचच उंच लाटा येत आहेत. नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या