पावसाचा फटका रेल्वे वाहतूक कोलमडली, रस्ते वाहतूक मंदावली, अंधेरी सब वे बंद

मुंबई : मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला फटका बसला. एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात संथ गतीने झाली. सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सब वे पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रुळ गायब झाले. रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. ऑफिसला जात असलेले अनेकजण पावसामुळे ठिकठिकाणी अडकले आहेत. मिळेल त्या वाहनाने पुढे प्रवास करुन जात आहेत.

मध्य रेल्वेच्या मशिद बंदर तसेच चुनाभट्टी आणि सायन या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक पुरती कोलमडली आहे.

केईएम रुग्णालयाच्या आवारातही पाणी साचले आहे. गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, वडाळा उड्डाणपुलाखालील भाग, हिंदमाता येथे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.

भरती आली असल्यामुळे उंचच उंच लाटा येत आहेत. नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य