पुढील तीन दिवस पावसाचे, नंतर 'एवढे' दिवस नसेल पाऊस

मुंबई : महाराष्ट्रात ऐन मे महिन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार सकाळपासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आठवड्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. आज म्हणजेच सोमवार २६ मे २०२५ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मान्सून केरळमध्ये पोहोचला आणि महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. शेतीच्या कामांचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे.

हवामान विभागाचा धक्कादायक अंदाज


आता सलग तीन दिवस पावसाची शक्यता असली तरी मे महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार नाही. ही स्थिती २८ किंवा २९ मे पासून निर्माण होईल. हीच स्थिती पाच जूनपर्यंत कायम राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल