पुढील तीन दिवस पावसाचे, नंतर 'एवढे' दिवस नसेल पाऊस

मुंबई : महाराष्ट्रात ऐन मे महिन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार सकाळपासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आठवड्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. आज म्हणजेच सोमवार २६ मे २०२५ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मान्सून केरळमध्ये पोहोचला आणि महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. शेतीच्या कामांचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे.

हवामान विभागाचा धक्कादायक अंदाज


आता सलग तीन दिवस पावसाची शक्यता असली तरी मे महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार नाही. ही स्थिती २८ किंवा २९ मे पासून निर्माण होईल. हीच स्थिती पाच जूनपर्यंत कायम राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची