Mumbai Rain: माहीममध्ये धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबई नैऋत्य मान्सूनने काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. काही दिवस आधीच येऊन धडकलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांचे जनजीवन पुरते विस्कळीत झालं आहे. सकाळी देखील पावसाची धोधो कायम राहिल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, दरम्यान माहीम (Mahim) मध्ये मुसळधार पावसामुळे हाजी कसम इमारतीचा काही भाग कोसळला (Building Collapse) असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच माहीममध्येच दुसऱ्या एका भागात झाड देखील कोसळलं आहे.


मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. दादर माहीम भागात देखील तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान माहीममध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत पितांबर लेन परिसरातील असून ती धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. सोमवारी या इमारतीच्या छताचा काही भाग आणि इमारतीचा जिना अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून पुढील बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने