Mumbai Rain: माहीममध्ये धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबई नैऋत्य मान्सूनने काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. काही दिवस आधीच येऊन धडकलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांचे जनजीवन पुरते विस्कळीत झालं आहे. सकाळी देखील पावसाची धोधो कायम राहिल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, दरम्यान माहीम (Mahim) मध्ये मुसळधार पावसामुळे हाजी कसम इमारतीचा काही भाग कोसळला (Building Collapse) असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच माहीममध्येच दुसऱ्या एका भागात झाड देखील कोसळलं आहे.


मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. दादर माहीम भागात देखील तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान माहीममध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत पितांबर लेन परिसरातील असून ती धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. सोमवारी या इमारतीच्या छताचा काही भाग आणि इमारतीचा जिना अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून पुढील बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा