Mumbai Rain: माहीममध्ये धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबई नैऋत्य मान्सूनने काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. काही दिवस आधीच येऊन धडकलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांचे जनजीवन पुरते विस्कळीत झालं आहे. सकाळी देखील पावसाची धोधो कायम राहिल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, दरम्यान माहीम (Mahim) मध्ये मुसळधार पावसामुळे हाजी कसम इमारतीचा काही भाग कोसळला (Building Collapse) असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच माहीममध्येच दुसऱ्या एका भागात झाड देखील कोसळलं आहे.


मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. दादर माहीम भागात देखील तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान माहीममध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत पितांबर लेन परिसरातील असून ती धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. सोमवारी या इमारतीच्या छताचा काही भाग आणि इमारतीचा जिना अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून पुढील बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या