Mumbai Rain: माहीममध्ये धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबई नैऋत्य मान्सूनने काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. काही दिवस आधीच येऊन धडकलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांचे जनजीवन पुरते विस्कळीत झालं आहे. सकाळी देखील पावसाची धोधो कायम राहिल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, दरम्यान माहीम (Mahim) मध्ये मुसळधार पावसामुळे हाजी कसम इमारतीचा काही भाग कोसळला (Building Collapse) असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच माहीममध्येच दुसऱ्या एका भागात झाड देखील कोसळलं आहे.


मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. दादर माहीम भागात देखील तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान माहीममध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत पितांबर लेन परिसरातील असून ती धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. सोमवारी या इमारतीच्या छताचा काही भाग आणि इमारतीचा जिना अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून पुढील बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण