पहिल्याच पावसात ‘मंत्रालय’ सामसूम; ७० टक्के अधिकारी वर्गाची दांडी

मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून संध्याकाळपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी चार वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली. या संबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही रात्रीपर्यंत सुरू असलेले मंत्रालयातील कामकाज सोमवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंतच आटोपल्याचं चित्र दिसून आलं.


दरम्यान,मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सेवा कोलमडलेली आहे. याचा परिणाम मंत्रालयातील कामकाजावर झालेला पाहायला मिळाला. अनेक अधिकारी, कर्मचारी कामावरती पोहोचू शकले नाही आणि जे पोहोचले त्यांना लवकर घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयातील रिकाम्या खुर्च्या, टेबल पाहायला मिळत आहे.


मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका राज्याची राजधानी मुंबईला बसला.


पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकीकडे येथील जीवन विस्कळीत झालेले असतानाच याचा फटका राज्याचा बोजा हाकणाऱ्या मंत्रालयालादेखील बसला. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मंत्रालयात केवळ ३० टक्के कर्मचारीच उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.


मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला. त्यात हवामान खात्याने येत्या तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंत्रालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दुपारी साडेतीन वाजताच घरी जाण्यास सांगण्यात आले. यामुळे इतरवेळी गजबजलेलं मंत्रालय सामसुम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि

ST Corporation : वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या हंगामी भाडेवाढीस १ महिन्याची मुदतवाढ

मुंबई, : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन

Powai Lake : पवई तलाव परिसराचा तब्बल १८ वर्षांनी होणार पुनर्विकास

मेट्रो आणि मलवाहिनी प्रकल्पाची कामे पूर्ण होताच होणार परिसर सुशोभित कोस्टल रोडच्या सल्लागाराची घेतली जाणार

Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे

Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे.