मीरा-भाईंदर बस आगार बनले समस्यांचे आगार

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारातील अग्निशमन यंत्रे निकामी झाली आहेत, सीसीटीव्ही मॉनिटर स्क्रीन बंद अवस्थेत आहे, चार्जिंग स्टेशन उघड्यावर पडले आहे. त्यामुळे महापालिकेचे बस आगार समस्यांचे आगार बनले असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली आहे. त्यावर सहाय्यक आयुक्त परिवहन यांनी तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताना दिले आहे.



सरकारी पोर्टलवर तसेच पालिका प्रशासनाकडे फोटोसह दिलेल्या तक्रारीत सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी नमूद केले आहे की, आगार परिसरात काही ठिकाणी अग्निशमन यंत्रे ठेवलेली आहेत मात्र ही सर्व यंत्रे निकामी झालेली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र सर्व्हर रूम किंवा लाईव्ह स्क्रिमिंग मॉनिटर स्क्रिन बंद असल्याने या सीसीटीव्हीचा उद्देश सफल होत नाही. आगार परिसरात परिवहन बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे; परंतु या चार्जिंग स्टेशन भोवती सुरक्षा भिंत तसेच सुरक्षा रक्षक नाही. आगारात कर्मचारी विश्रांती गृह आहे मात्र विश्रांती घेण्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नाही. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याच बरोबर परिवहन सेवा सुध्दा अनियमित झाली असल्याची तक्रार अनेक प्रवासी करत आहेत. परिवहन सेवेच्या अनेक डिझेल बस यांत्रिक बिघाडामुळे दररोज रस्तोरस्ती बंद अवस्थेत उभ्या असतात. तसेच काही इ-बससुद्धा बंद पडलेल्या असतात, तर इलेक्ट्रिक बस चार्जिंग नसल्यामुळे ठाण्यावरून कोणताही थांबा न घेता थेट डेपोमध्ये आणल्या जात आहेत. तसेच त्या पूर्ण चार्ज न करताच पुढे चालविण्यात येतात. या सर्व गोंधळामुळे प्रवाशांचे हाल होतात. हे सर्व पाहता परिवहन उपक्रमातील बस डेपो व इमारती बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सहाय्यक आयुक्त (परिवहन) यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविले आहे.
Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या