मीरा-भाईंदर बस आगार बनले समस्यांचे आगार

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारातील अग्निशमन यंत्रे निकामी झाली आहेत, सीसीटीव्ही मॉनिटर स्क्रीन बंद अवस्थेत आहे, चार्जिंग स्टेशन उघड्यावर पडले आहे. त्यामुळे महापालिकेचे बस आगार समस्यांचे आगार बनले असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली आहे. त्यावर सहाय्यक आयुक्त परिवहन यांनी तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताना दिले आहे.



सरकारी पोर्टलवर तसेच पालिका प्रशासनाकडे फोटोसह दिलेल्या तक्रारीत सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी नमूद केले आहे की, आगार परिसरात काही ठिकाणी अग्निशमन यंत्रे ठेवलेली आहेत मात्र ही सर्व यंत्रे निकामी झालेली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र सर्व्हर रूम किंवा लाईव्ह स्क्रिमिंग मॉनिटर स्क्रिन बंद असल्याने या सीसीटीव्हीचा उद्देश सफल होत नाही. आगार परिसरात परिवहन बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे; परंतु या चार्जिंग स्टेशन भोवती सुरक्षा भिंत तसेच सुरक्षा रक्षक नाही. आगारात कर्मचारी विश्रांती गृह आहे मात्र विश्रांती घेण्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नाही. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याच बरोबर परिवहन सेवा सुध्दा अनियमित झाली असल्याची तक्रार अनेक प्रवासी करत आहेत. परिवहन सेवेच्या अनेक डिझेल बस यांत्रिक बिघाडामुळे दररोज रस्तोरस्ती बंद अवस्थेत उभ्या असतात. तसेच काही इ-बससुद्धा बंद पडलेल्या असतात, तर इलेक्ट्रिक बस चार्जिंग नसल्यामुळे ठाण्यावरून कोणताही थांबा न घेता थेट डेपोमध्ये आणल्या जात आहेत. तसेच त्या पूर्ण चार्ज न करताच पुढे चालविण्यात येतात. या सर्व गोंधळामुळे प्रवाशांचे हाल होतात. हे सर्व पाहता परिवहन उपक्रमातील बस डेपो व इमारती बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सहाय्यक आयुक्त (परिवहन) यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविले आहे.
Comments
Add Comment

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले