'मुंबईत थायरॉइडच्या रुग्णांमध्ये वाढ'

मुंबई :भारतामध्ये जवळपास ५० दशलक्ष भारतीय, विशेषतः महिला, थायरॉइड विकारांनी ग्रस्त आहे आणि हे प्रमाण दरवर्षी मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये वाढताना दिसत आहे, असे आरोग्यविषयक शासकीय आकडेवारी व निदान करणाऱ्या प्रयोगशाळांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून
दिसून येते.


नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४ ने असे आढळले की, महाराष्ट्रातील १.८ टक्के महिलांना २०१५-२०१६ मध्ये गालगुंड किंवा इतर थायरॉइड विकार होते आणि एनएफएचएस-५ नुसार तीन वर्षांनी हे प्रमाण २.१ टक्के पर्यंत वाढले आहे. भारतात आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २.२ टक्क्यांवरून २.७ टक्के पर्यंत वाढलेले दिसते. आयोडीनची कमतरता, विशेषतः अंतर्गत भागांमध्ये, थायरॉइड विकारांचे एक मुख्य कारण आहे. आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल, आणि पर्यावरणीय घटक देखील थायरॉइड विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. थायरॉईड विकारांची वाढती संख्या लक्षात घेता, नियमित तपासणी, योग्य आहार, आणि सततची वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे.



विशेषतः महिलांनी आणि वयस्कर व्यक्तींनी थायरॉइड तपासणीसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. लीलावती हॉस्पिटल, वांद्रे येथील ज्येष्ठ एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी म्हणाले की, वाढलेली संख्या ही लोकांमधील या आजाराविषयची वाढती जागरूकता आणि थायरॉइड निदान चाचण्यांमुळे दिसून येते. ऑटोइम्युनिटी ही संपूर्ण जगभर वाढत आहे आणि भारतही याला अपवाद नाही, परंतु थायरॉइड विकारांच्या संख्येमध्ये वाढ होणे हे जागरूकता आणि निदानाचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. आजच्या महिला एकाच वेळी अनेक कामं करतात आणि तणावांमुळे थायरॉइड विकारांची शक्यता वाढत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची