देहू संस्थानला १ कोटींचा निधी मंजूर

पिंपरी : देहूगाव वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन महोत्सव ओतूर येथे अत्यंत भक्तिभावाने साजरा होत आहे. या निमित्ताने ओतूर गावात जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांचे सद्गुरू आणि संत चोखोबा महाराज यांचा त्रिवेणी संगम साधल्याची भावना भाविकांत दाटून आली.


या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांच्या माध्यमातून अक्षय महाराज भोसले यांनी प्रकाशनासाठी देहू संस्थानच्या वतीने एक कोटींची मागणी केली असता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत देहू संस्थानसाठी संत तुकाराम महाराज अभंग गाथेच्या प्रकाशनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी ४८ तासांत अधिकृत खात्यावर वर्ग केला जाणार आहे. संत श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचे ईबूक करून विश्वभर संत साहित्य नेणार अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.


यावेळी सामंत म्हणाले, "ज्यांनी 'तुकाराम तुकाराम' नामाचा उच्चार जरी केला तरी यमालाही थरकाप सुटतो, त्या संतांच्या गाथेचे रक्षण साक्षात भगवंताने केले. ही गाथा म्हणजे पाचवा वेद आहे. यापूर्वी ज्ञानेश्वरी छपाईसाठी देखील आपण एक कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला." माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध भागांतून लक्षावधी वारकरी सहभागी झाले आहेत. ही अभूतपूर्व उपस्थिती वैश्विक विक्रमात नोंदवली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज केशवमहाराज नामदास, देहू देवस्थान विश्वस्त जालिंदर महाराज मोरे उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या