संगमनेरच्या वाहतुकीबाबत कडक पावले उचलणार : पोलीस अधीक्षक घार्गे

संगमनेर : संगमनेर शहरातील वाहतुक प्रश्नांबाबत माहिती घेणार असून याबाबत लवकरच कडक पावले उचलली जातील. तसेच येथील सिग्नल देखील पुढील महिन्यात सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोमनाथ घार्गे यांनी स्वीकारल्यानंतर आज शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली.यावेळी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, संगमनेर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे म्हणाले की, संगमनेर येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचे समजले असून याबाबत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या सोबत चर्चा झाली आहे.शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची एक टीम याबाबत सर्वे करणार आहे.त्यानंतर याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल.


पुढील महिन्यात दिनांक १५ जून २०२५ पर्यंत संगमनेर शहरातील दोन ते तीन चांगले चौक फायनल करून याठिकाणी असलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर संगमनेर शहरातील बंद असलेले सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बंद आहेत ते सर्व सुरू करण्यात येतील, जेणेकरून पोलिसांना देखील त्याची मदत होईल. तसेच संगमनेर शहर पोलिस ठाण्यात जरी पोलिसांचे संख्या बळ कमी असेल तरी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी संख्या बळाची माहिती घेवून पोलिसांचे संख्या बळ कसे वाढवता येईल याबाबत प्रयत्न करणार आहे. तर जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंदे याबाबत प्रत्येक तालुक्यात कडक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी