पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत घट

टँकरची संख्या १५ टक्के कमी


पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील पाण्याची मागणी तसेच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे.


शहरात मार्च तसेच एप्रिल या दोन महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती. महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.


मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत पाण्याची मागणी २५ टक्के वाढली होती. आता ही मागणी १५ टक्के कमी झाली आहे. पाण्याची मागणी कमी झाल्याने टँकरची संख्याही कमी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरातील टँकरची संख्या वाढली होती. नागरिकांकडून होणारी टँकरची मागणी लक्षात घेऊन टँकरचालक महापालिकेकडून पाणी घेऊन उपनगरांमधील सोसायट्यांना देत होते. मात्र, पावसामुळे यामध्येही घट झाली आहे. सद्य:स्थितीत टँकरच्या मागणीत १० टक्के घट झाली आहे.


गेल्या दोन महिन्यांपूर्वी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढली होती. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. गेल्या आठवड्यापासून पाण्याच्या तक्रारींत घट झाली आहे. काही ठिकाणी टँकरची मागणीही कमी झाली आहे.


- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा