पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत घट

टँकरची संख्या १५ टक्के कमी


पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील पाण्याची मागणी तसेच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे.


शहरात मार्च तसेच एप्रिल या दोन महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती. महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.


मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत पाण्याची मागणी २५ टक्के वाढली होती. आता ही मागणी १५ टक्के कमी झाली आहे. पाण्याची मागणी कमी झाल्याने टँकरची संख्याही कमी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरातील टँकरची संख्या वाढली होती. नागरिकांकडून होणारी टँकरची मागणी लक्षात घेऊन टँकरचालक महापालिकेकडून पाणी घेऊन उपनगरांमधील सोसायट्यांना देत होते. मात्र, पावसामुळे यामध्येही घट झाली आहे. सद्य:स्थितीत टँकरच्या मागणीत १० टक्के घट झाली आहे.


गेल्या दोन महिन्यांपूर्वी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढली होती. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. गेल्या आठवड्यापासून पाण्याच्या तक्रारींत घट झाली आहे. काही ठिकाणी टँकरची मागणीही कमी झाली आहे.


- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या