मनीची शाळा

  32

स्नेहधारा : पूनम राणे


सकाळची ७ ची वेळ होती. सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. पक्षांचा किलबिलाट चालू होता. दोन-तीन माकडे झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होती. खारुताईची जोडी झाडावरून वर-खाली करत धावण्याची स्पर्धा खेळत होत्या. कोकिळेचा पंचम स्वर सुरू होता.


इतक्यात प्रार्थनेची बेल वाजली. सारी मुले धावतच मैदानात जमा झाली. वर्गांच्या रांगा करण्यात आल्या. वर्गशिक्षक आपापल्या वर्गासमोर उभे राहून रांगा नीट करू लागले. सावधान-विश्रामच्या सूचना देण्यात आल्या. प्रार्थना सुरू झाली. ध्यानधारणेची वेळ होती. इतक्यात एक मनीमाऊ एका मुलीच्या मांडीवर बसून ध्यान करत असताना पाहिली. पांढऱ्या शुभ्र रंगाची, कनवाळू डोळ्यांची, छोटीशी मनी. मनी रोज प्रत्येक मुलाच्या मांडीवर बसून ध्यान करणे हे तिचे नित्याचेच चालू होते.

मनी आता विद्यार्थ्यांची मित्र बनली होती. मनीला विद्यार्थ्यांशिवाय आणि विद्यार्थ्यांना मनीशिवाय करमत नसे. वर्गात एकूण पन्नास विद्यार्थी होते. नित्यनेमाने रोज प्रत्येक विद्यार्थी आळीपाळीने मनीला घरून बाटलीतून दूध घेऊन येत होते. विद्यार्थ्यांना तिचा लळाच लागला होता. पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत मनी वर्गातच बसलेली असे. कान टवकारून प्रत्येक शिक्षकाचा तासालाही बसत असे. आवाज न करता. अशाप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम, पशुप्रेम दिसून येत होते. ममत्वाचा एक विशेष गुण संक्रमित होत होता. जीवन मूल्याची रुजवण होत होती.


उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सुट्टी असते. मात्र अ‍ॅडमिशनकरिता कार्यालय चालूच असते. या काळात मनी मात्र कुठेच दिसली नाही. “ न जाणो तिला सुद्धा विद्यार्थ्यांनी एक एक दिवस आपल्या घरी बोलावलं असेल. आपली मित्र-मैत्रीण म्हणून!” जूनमध्ये शाळा सुरू होईल आणि मनी नक्कीच पुन्हा तिच्या शाळेत परत येईल. हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले