टीम इंडियाप्रमाणे काम केले, तर काहीही अशक्य नाही

नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना


नवी दिल्ली : विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे. जेव्हा प्रत्येक राज्य विकसित असेल, तेव्हा भारत विकसित होईल. ही देशातील १४० कोटी नागरिकांची आकांक्षा आहे. भारताला विकासाचा वेग वाढवावा लागेल. जर केंद्र आणि सर्व राज्ये एकत्र येऊन टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम करतील, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या गव्हर्निग काऊन्सिल विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘विकसित भारतासाठी विकसित राज्य @२०४७’ या विषयावर ही बैठक झाली. नीती आयोगाच्या परिषदेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पंतप्रधानांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, उपराज्यपालांशी हा पहिलाच मोठा संवाद आहे. या बैठकीत मोदी यांनी देशाच्या विकासाची गती वाढवण्याची गरज आहे, अशी गरज व्यक्त केली. देशाच्या विकासात राज्य तसेच केंद्र सरकार यांनी एकत्र येत काम केले पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी या व्यक्त केली.



बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले उद्घाटनपर भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपराज्यपाल, प्रशासकांनी अजेंडा विषयांवर हस्तक्षेप करण्यावरील सत्राला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीच्या अजेंड्यात ‘विकसित राज्य; उद्योजकता, रोजगार, कौशल्याला प्रोत्साहन देणे; एमएसएमई रोजगार यासारख्या इतर मुद्द्यांचा समावेश होता.



मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार


राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकारही महाराष्ट्र २०४७ असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. १०० दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना, उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी ७०० हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. २०२४-२५ या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक १.३९ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. दावोसमध्ये १५.९६ लाख कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील ५० टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया सुरू झाली असून, त्यातील अधिकाधिक गुंतवणूक ही दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे. विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, विविध सुधारणा आणि रोजगार वाढविण्यावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्ग, अटलसेतू, कोस्टर रोड आदी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला आणि पायाभूत क्षेत्रातील क्रांतीला गती देत आहेत. वाढवण पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे क्षेत्रीय विकासाला चालना देणार असून, त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

Comments
Add Comment

Agni-6 Missile : भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे जगभर खळबळ; ओडिशा किनारपट्टीवरून ‘अग्नी-6’ क्षेपणास्त्र चाचणीची चर्चा

ओडिशा : भारताने गुरुवारी (७ मे) सायंकाळी Odisha किनारपट्टीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) चाचणी केल्याची

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू

West Bengal Next Deputy CM : पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा 'महाराष्ट्र पॅटर्न'! भाजप देणार दोन उपमुख्यमंत्री ? शुभेंदू अधिकारींकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. मिळालेल्या ताज्या

Mumbai-Bengaluru Superfast Train : प्रवाशांची प्रतीक्षा संपली! मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेनला हिरवा कंदील; लवकरच 'वंदे भारत स्लीपर'चीही शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी बुधवारी प्रवाशांना एक मोठी

Telangana Shocking Video : भररस्त्यात थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; व्हिडिओ पहा

तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना