टीम इंडियाप्रमाणे काम केले, तर काहीही अशक्य नाही

  49

नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना


नवी दिल्ली : विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे. जेव्हा प्रत्येक राज्य विकसित असेल, तेव्हा भारत विकसित होईल. ही देशातील १४० कोटी नागरिकांची आकांक्षा आहे. भारताला विकासाचा वेग वाढवावा लागेल. जर केंद्र आणि सर्व राज्ये एकत्र येऊन टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम करतील, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या गव्हर्निग काऊन्सिल विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘विकसित भारतासाठी विकसित राज्य @२०४७’ या विषयावर ही बैठक झाली. नीती आयोगाच्या परिषदेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पंतप्रधानांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, उपराज्यपालांशी हा पहिलाच मोठा संवाद आहे. या बैठकीत मोदी यांनी देशाच्या विकासाची गती वाढवण्याची गरज आहे, अशी गरज व्यक्त केली. देशाच्या विकासात राज्य तसेच केंद्र सरकार यांनी एकत्र येत काम केले पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी या व्यक्त केली.



बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले उद्घाटनपर भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपराज्यपाल, प्रशासकांनी अजेंडा विषयांवर हस्तक्षेप करण्यावरील सत्राला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीच्या अजेंड्यात ‘विकसित राज्य; उद्योजकता, रोजगार, कौशल्याला प्रोत्साहन देणे; एमएसएमई रोजगार यासारख्या इतर मुद्द्यांचा समावेश होता.



मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार


राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकारही महाराष्ट्र २०४७ असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. १०० दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना, उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी ७०० हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. २०२४-२५ या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक १.३९ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. दावोसमध्ये १५.९६ लाख कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील ५० टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया सुरू झाली असून, त्यातील अधिकाधिक गुंतवणूक ही दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे. विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, विविध सुधारणा आणि रोजगार वाढविण्यावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्ग, अटलसेतू, कोस्टर रोड आदी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला आणि पायाभूत क्षेत्रातील क्रांतीला गती देत आहेत. वाढवण पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे क्षेत्रीय विकासाला चालना देणार असून, त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे