देवळेकरांकडून भारतीय सैनिकांचा अभिमान; तिरंगा रॅलीने वेधले लक्ष

  24

देवळा : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर व भारतीय सेनेच्या सन्मानार्थ देवळा शहरातून शनिवार (दि .२४) रोजी सकाळी १० वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली. येथील सुट्टीवर आलेले तसेच माजी सैनिक, राष्ट्रप्रेमी नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व विद्यार्थीवर्गाने यावेळी उपस्थित होते. माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत शाळा, महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी तसेच महिला देखील सहभागी झाल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज व भारत माता की जय च्या जयघोषात निघालेल्या रॅलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शिवस्मारक, बसस्थानक, पाच कंदील, सुभाषरोड व बाजारपेठेतून ही रॅली पुन्हा शिवस्मारकाजवळ आली. यावेळी सिंदूर ऑपरेशनबद्दल तसेच भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबाबत माहिती सांगत एकजुटीचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष संजय आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, दिनकर निकम, भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर आहेर,अशोक आहेर, प्रमोद पाटील, माजी सैनिक मांगु लोखंडे, देवानंद वाघ, दिलीप पाटील, प्रतीक आहेर, संदीप देवरे, स्वप्नील पाटील, एन.डी. पाटील, डॉ.रमणलाल सुराणा, प्रदीप सुराणा, योगेश आहिरे, पंकज गांगुर्डे, जगन्नाथ माळी, प्रमोद शेवाळकर, मनोज गुजरे, शंकर निकम, शब्बीर शेख, तुषार गुंजाळ, वैद्यनाथ देवरे, समाधान महाजन, अरुणा खैरणार,नीलिमा आहेर, बाळासाहेब आहेर, मनोज आहेर, समाधान सोनजे,नईम शेख यांच्यासह देवळा तालुक्यातील अकेडमीचे तसेच महाविद्यालयाचे व क्लासेसचे विद्यार्थी,विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून