मुख्यमंत्र्यांचा आता १५० दिवसांचा कृती आराखडा

पुणे : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कृती आराखड्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल, ग्रामविकास आणि नगरविकास विभागांच्या प्रत्येकी सहा समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या समित्यांच्या अहवालानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक बदल केले जाणार आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यानंतर आता १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी पुण्यात ऑर्किड हॉटेल येथे महसूल विभागाची कार्यशाळा, तर यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा) येथे ग्रामविकास आणि नगरविकास विभागांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किमान सहा ते आठ तास चर्चा केली.


कार्यशाळेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि सचिव उपस्थित होते. या कार्यशाळांमधून प्रशासकीय सुधारणेविषयी मंथन करून सुधारणांचे नवे पर्व सुरू करण्यासाठी १५० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी प्रशासकीय बदलांसाठी अभ्यासगटांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या अभ्यासगटांकडून येणाऱ्या अहवालांवर आधारित धोरण निश्चिती होणार आहे.


प्रत्येक गटासाठी मार्गदर्शक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. या गटांना विषय ठरवून देण्यात आले असून, हे गट दिलेल्या कालावधीत राज्य सरकारला अहवाल देणार आहेत.

Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा