Patanjali E-Schooter: पतंजली लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर! काय आहे सत्य? जाणून घ्या

योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 


नवी दिल्ली: सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल करत आहेत. या स्पर्धेत रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीने देखील उडी घेतली असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यामुळे आयुर्वेदिक क्षेत्रातील रामदेव बाबा आता गाड्या विकणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तर या मागे नेमकं खर काय कारण आहे? ते जाणून घ्या.

रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी लवकरच ई-स्कूटर  घेऊन येत असल्याचे म्हंटले जात आहे. पतंजलीच्या ई-स्कूटर बाबत अनेक मोठमोठे दावे देखील करण्यात आले आहेत. असे म्हंटले जात आहे की, ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 440 किलोमीटरची रेंज देईल,  ज्याची किंमत 15,000 पासून सुरू होईल असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यांसह एका इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

रामदेव बाबा आता खरंच ई-स्कूटर विकणार?


या महिन्याच्या सुरुवातीला काही वेबसाईट्स आणि सोशल युजर्सनी पतंजलीच्या ई-स्कूटरबाबत काही माहिती प्रसिद्ध केली होती. त्यात एका इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र सत्य काही वेगळेच आहे.  कारण पतंजलीने ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याबाबत कधीच काही सांगितलेले नाही. याशिवाय पतंजलीइ लेक्ट्रिक स्कूटर्सचे स्पेसिफिकेशनही एखाद्या विनोदापेक्षा कमी नाहीत.

पतंजली काय विकते?


पतंजली कंपनी अनेक आयुर्वेद उत्पादने तसेच औषधे, साबण आणि ब्युटी प्रॉडक्ट्स बाजारात विकते. ही कंपनी आयुर्वेदिक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करते. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांवरही भारतातील लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे पतंजली इलेक्ट्रिक उत्पादनात सध्या तरी उतरेल असे वाटत नाही, त्यामुळे पतंजली अशाप्रकारे कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे, ही माहितीच मुळात निराधार आहे.
Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे