Patanjali E-Schooter: पतंजली लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर! काय आहे सत्य? जाणून घ्या

  41

योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 


नवी दिल्ली: सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल करत आहेत. या स्पर्धेत रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीने देखील उडी घेतली असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यामुळे आयुर्वेदिक क्षेत्रातील रामदेव बाबा आता गाड्या विकणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तर या मागे नेमकं खर काय कारण आहे? ते जाणून घ्या.

रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी लवकरच ई-स्कूटर  घेऊन येत असल्याचे म्हंटले जात आहे. पतंजलीच्या ई-स्कूटर बाबत अनेक मोठमोठे दावे देखील करण्यात आले आहेत. असे म्हंटले जात आहे की, ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 440 किलोमीटरची रेंज देईल,  ज्याची किंमत 15,000 पासून सुरू होईल असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यांसह एका इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

रामदेव बाबा आता खरंच ई-स्कूटर विकणार?


या महिन्याच्या सुरुवातीला काही वेबसाईट्स आणि सोशल युजर्सनी पतंजलीच्या ई-स्कूटरबाबत काही माहिती प्रसिद्ध केली होती. त्यात एका इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र सत्य काही वेगळेच आहे.  कारण पतंजलीने ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याबाबत कधीच काही सांगितलेले नाही. याशिवाय पतंजलीइ लेक्ट्रिक स्कूटर्सचे स्पेसिफिकेशनही एखाद्या विनोदापेक्षा कमी नाहीत.

पतंजली काय विकते?


पतंजली कंपनी अनेक आयुर्वेद उत्पादने तसेच औषधे, साबण आणि ब्युटी प्रॉडक्ट्स बाजारात विकते. ही कंपनी आयुर्वेदिक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करते. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांवरही भारतातील लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे पतंजली इलेक्ट्रिक उत्पादनात सध्या तरी उतरेल असे वाटत नाही, त्यामुळे पतंजली अशाप्रकारे कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे, ही माहितीच मुळात निराधार आहे.
Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प