रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर १ जूनपासून कारवाई

मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची फेब्रुवारी २०२५ मध्ये दरवाढ करण्यात आली. त्यानुसार रिक्षा आणि टॅक्सीचे अनुक्रमे २६ आणि ३१ रुपये भाडे आकारण्यात येत आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली. नवीन दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे; परंतु, मुंबईतील सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३१ मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मान्यता दिली. यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये झाले. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत दरपत्रकानुसार भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुमारे ४.६२ लाखांहून अधिक रिक्षा आणि टॅक्सी असून यापैकी सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन अद्याप झालेले नाही.

Comments
Add Comment

आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश • मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय आढावा बैठक •

पेट्रोल-डिझेलच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवा

मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार मुंबई :

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा

'एसआयआर' प्रक्रियेत एकाही पात्र मतदार वागळणार नाही

 मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम; बोगस मतदान रोखणे हाच मोहिमेचा हेतू मुंबई : मतदार याद्यांच्या

'Mumbai Tech Week 2026' : मुंबईत भरणार १० हजार 'डेव्हलपर्स' आणि तंत्रज्ञानप्रेमींचा मेळा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'Mumbai Tech Week 2026' : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील जागतिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून, महाराष्ट्र आता

पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि 'युएई'ला मागे टाकणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; १० वर्षांत अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढवला मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता