Gas Tanker Overturned: ताम्हिणी घाटात विषारी गॅसचा टँकर पलटला

पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प


माणगांव: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या डोंगरवाडी गावच्या हद्दीतील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat Accident) गॅस टँकर पलटी झाल्यामुळे, पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. 25 मे च्या सलग बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट मार्गावरील रस्त्याच्या साईड पट्टीवरुन माती सरकत आहे, आणि यामुळेच हा अपघात झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाट आणि शेजारील परिसरात सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेचा दरड सदृश्य भाग कोसळला, दरम्यान या रस्त्यातून जात असताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली. तात्काळ आपत्तकालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्याने, संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली. विषारी गॅस वातावरणात पसरविण्यापासून थांबविण्यात आले.



हायड्रोक्लोरीक गॅसचे वाहतूक करणाऱ्या टँकरचे नुकसान


या अपघातात हायड्रोक्लोरीक ऍसिड वाहतूक करणाऱ्या टँकर चे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन या मार्गांवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिक यांच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचे काम संध्याकाळी उशीरा पर्यंत सुरु होते. या घटनेमुळे डोंगरप्रवण भागातील रस्तासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी 3 ते 4 तास कालावधी लागू शकतो त्यामुळे सदर मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहतूकदारानी याची नोंद घ्यावी असे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याकडुन समाज माध्यमे व प्रसारमाध्यमाद्वारे करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार