Gas Tanker Overturned: ताम्हिणी घाटात विषारी गॅसचा टँकर पलटला

पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प


माणगांव: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या डोंगरवाडी गावच्या हद्दीतील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat Accident) गॅस टँकर पलटी झाल्यामुळे, पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. 25 मे च्या सलग बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट मार्गावरील रस्त्याच्या साईड पट्टीवरुन माती सरकत आहे, आणि यामुळेच हा अपघात झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाट आणि शेजारील परिसरात सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेचा दरड सदृश्य भाग कोसळला, दरम्यान या रस्त्यातून जात असताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली. तात्काळ आपत्तकालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्याने, संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली. विषारी गॅस वातावरणात पसरविण्यापासून थांबविण्यात आले.



हायड्रोक्लोरीक गॅसचे वाहतूक करणाऱ्या टँकरचे नुकसान


या अपघातात हायड्रोक्लोरीक ऍसिड वाहतूक करणाऱ्या टँकर चे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन या मार्गांवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिक यांच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचे काम संध्याकाळी उशीरा पर्यंत सुरु होते. या घटनेमुळे डोंगरप्रवण भागातील रस्तासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी 3 ते 4 तास कालावधी लागू शकतो त्यामुळे सदर मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहतूकदारानी याची नोंद घ्यावी असे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याकडुन समाज माध्यमे व प्रसारमाध्यमाद्वारे करण्यात आले होते.

Comments
Add Comment

कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य