ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या केवळ वावड्या! 'दोनदा फसवले', संदीप देशपांडेंचा उद्धव सेनेवर थेट हल्ला!

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या चर्चांना मोठा धक्का दिला आहे. “ठाकरे गटाने आम्हाला दोन वेळा फसवले आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी युतीच्या शक्यतेवर पाणी फेरले आहे.



काय म्हणाले संदीप देशपांडे?


देशपांडे म्हणाले, “२०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकांपूर्वी आम्ही युतीसाठी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर बाळा नांदगावकर यांना पाठवलं होतं. पण चर्चाच सुरू ठेवत त्यांनी आमचा विश्वासघात केला.”


ते पुढे म्हणाले, “सध्या उबाठा गटासोबत आमचा कोणताही संवाद नाही. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन ‘सकारात्मक आहोत’ म्हणतात, पण युती करायची असेल तर प्रत्यक्ष पुढे यावं लागेल. आम्ही फक्त चर्चा नाही, कृती केली होती.”



राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर संशय


राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत युतीबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर संदीप देशपांडे म्हणाले, “त्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय बोललं आणि काय अर्थ निघाला, यावरच आमच्यात संभ्रम आहे.”


दरम्यान, संजय राऊत यांनी याआधी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत आणि मराठी माणसासाठी सर्व भेद विसरायला हवे. मात्र मनसेकडून आता आलेल्या प्रतिक्रियेनंतर ही शक्यता अजूनही अंधारातच आहे.


सद्यस्थितीत ठाकरे सेना आणि मनसे युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित आहे. संदीप देशपांडेंच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीच्या शक्यतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवणाऱ्यांवर दगडफेक, ६ पोलीस आणि ४ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार