Team India:  इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा, गिलकडे जाणार नेतृत्व?

मुंबई:  आता प्रतीक्षा संपली आहे. भारताला आज नवा कसोटी कर्णधार मिळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवार २४ मे म्हणजेच आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कसोटी संघाची घोषणा करणार आहे. सगळ्यात मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे कसोटी कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची. रोहित शर्मानंतर कोणाकडे नेतृत्व सोपवले जाणार हे आज समजणार आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत एक नाव सर्वात पुढे आहे ते म्हणजे शुभमन गिल. २५ वर्षीय शुभमन गिलकडे नेतृत्वाती माळ जाणार का याचे उत्तर काही तासांतच मिळेल.


आज टीम इंडियाची निवड मुंबईच्या बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये होईल. त्यानंतक दीड वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली जाईल. येते कर्णधारपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. जसप्रीत बुमराहने खुद्द सांगितले की तो इंग्लंड दौऱ्यावर ३ कसोटी सामने खेळू शकणार आहे. अशातच शुभमन गिलकडे नेतृत्व जाण्याची दाट शक्यता आहे. बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये दोन कसोटी सामन्यांसह तीन सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.



भारत वि इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक


पहिली कसोटी २० ते २४ जून- हेडिंग्ले, लीड्स


दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन, बर्मिंगहम


तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन


चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर


पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - द ओव्हल, लंडन



इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संभाव्य संघ


शुभमन गिल(कर्णधार), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा,  मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा, श्रेयस अय्यर, करूण नायर



हे खेळाडूही दावेदार


अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आकाश दीप, अभिमन्यू इश्वरन, अंशुल कम्बोज, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, तनुष कोटियन, नवदीप सैनी, ख़लील अहमद.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी