Team India:  इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा, गिलकडे जाणार नेतृत्व?

मुंबई:  आता प्रतीक्षा संपली आहे. भारताला आज नवा कसोटी कर्णधार मिळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवार २४ मे म्हणजेच आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कसोटी संघाची घोषणा करणार आहे. सगळ्यात मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे कसोटी कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची. रोहित शर्मानंतर कोणाकडे नेतृत्व सोपवले जाणार हे आज समजणार आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत एक नाव सर्वात पुढे आहे ते म्हणजे शुभमन गिल. २५ वर्षीय शुभमन गिलकडे नेतृत्वाती माळ जाणार का याचे उत्तर काही तासांतच मिळेल.


आज टीम इंडियाची निवड मुंबईच्या बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये होईल. त्यानंतक दीड वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली जाईल. येते कर्णधारपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. जसप्रीत बुमराहने खुद्द सांगितले की तो इंग्लंड दौऱ्यावर ३ कसोटी सामने खेळू शकणार आहे. अशातच शुभमन गिलकडे नेतृत्व जाण्याची दाट शक्यता आहे. बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये दोन कसोटी सामन्यांसह तीन सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.



भारत वि इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक


पहिली कसोटी २० ते २४ जून- हेडिंग्ले, लीड्स


दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन, बर्मिंगहम


तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स, लंडन


चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर


पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - द ओव्हल, लंडन



इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संभाव्य संघ


शुभमन गिल(कर्णधार), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा,  मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा, श्रेयस अय्यर, करूण नायर



हे खेळाडूही दावेदार


अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आकाश दीप, अभिमन्यू इश्वरन, अंशुल कम्बोज, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, तनुष कोटियन, नवदीप सैनी, ख़लील अहमद.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल