PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीने शेवट केला गोड, पंजाबला ६ विकेट राखत हरवले

  84

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ६६व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाला दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट राखत हरवले. याविजयासह दिल्लीने आयपीएलचा शेवट गोड केला आहे. दिल्लीसमोर पंजाबने विजयासाठी २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले.


या सामन्यात टॉस जिंकत दिल्लीने पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद २०६ धावा केल्या होत्या. दिल्लीला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना २०७ धावा हव्या होत्या. दिल्लीने या सामन्यात २०८ धावा केल्या.


दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक ५८ धावा ठोकल्या. तर सलामीवीर केएल राहुलने ३५ धावा केल्या. फाफ डू प्लेसिसने २३ धावा केल्या. करूण नायरने ४४ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली राहिली नाही. प्रियांश आर्य आणि प्रभासिमरन यांनी डावाची सुरूवात केली. मात्र दुसऱ्याच षटकांत प्रियांशने विकेट गमावली. त्याने केवळ ६ धावा केल्या. यानंतर जोस इंग्लीश आणि प्रभसिमरनची चांगली जोडी जमली. दोघांनी तडाखेबाज खेळी केली. ५ षटकांत त्यांनी पंजाबचा स्कोर ५० पार नेला. यानंतर ८व्या षटकांत प्रभासिमरनने आपली विकेट गमावली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा यांच्यात चांगली भागीदारी झाली. ११व्या षटकांत पंजाब १०० पार पोहोचला. मात्र १३व्या षटकांत पंजाबला चौथा झटका बसला. नेहाल १६ धावा करून बाद झाला. यानंतर १६व्या षटकांत शशांक बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर टिकून होता. त्याने १७व्या षटकांत अर्धशतक ठोकले. यानंतर तो बाद झाला.


Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल