PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीने शेवट केला गोड, पंजाबला ६ विकेट राखत हरवले

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ६६व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाला दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट राखत हरवले. याविजयासह दिल्लीने आयपीएलचा शेवट गोड केला आहे. दिल्लीसमोर पंजाबने विजयासाठी २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले.


या सामन्यात टॉस जिंकत दिल्लीने पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद २०६ धावा केल्या होत्या. दिल्लीला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना २०७ धावा हव्या होत्या. दिल्लीने या सामन्यात २०८ धावा केल्या.


दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक ५८ धावा ठोकल्या. तर सलामीवीर केएल राहुलने ३५ धावा केल्या. फाफ डू प्लेसिसने २३ धावा केल्या. करूण नायरने ४४ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली राहिली नाही. प्रियांश आर्य आणि प्रभासिमरन यांनी डावाची सुरूवात केली. मात्र दुसऱ्याच षटकांत प्रियांशने विकेट गमावली. त्याने केवळ ६ धावा केल्या. यानंतर जोस इंग्लीश आणि प्रभसिमरनची चांगली जोडी जमली. दोघांनी तडाखेबाज खेळी केली. ५ षटकांत त्यांनी पंजाबचा स्कोर ५० पार नेला. यानंतर ८व्या षटकांत प्रभासिमरनने आपली विकेट गमावली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा यांच्यात चांगली भागीदारी झाली. ११व्या षटकांत पंजाब १०० पार पोहोचला. मात्र १३व्या षटकांत पंजाबला चौथा झटका बसला. नेहाल १६ धावा करून बाद झाला. यानंतर १६व्या षटकांत शशांक बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर टिकून होता. त्याने १७व्या षटकांत अर्धशतक ठोकले. यानंतर तो बाद झाला.


Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत