नवी मुंबई महापालिकेतील ६६८ पदांसाठी ८४ हजारांपेक्षा अधिक अर्ज

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 'गट-क' आणि 'गट - ड' मध्ये ३० संवर्गातील ६६८ पदांसाठी सरळसेवेव्दारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. २८ मार्च रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच १९ मे पर्यंत तब्बल ८४,७७४ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.


प्राप्त अर्जांमध्ये सर्वाधिक २३३४७ अर्ज हे लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या १३५ जागांसाठी प्राप्त झाले असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) संवर्गाच्या ५१ जागांसाठी १५,४४७ तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या ८३ जागांसाठी १४५५८ आणि स्टाफ नर्स / मिडवाईफ (G.N.M.) संवर्गाच्या १३१ पदांसाठी १२,६३४ अर्ज प्राप्त झालेले आहेत.


अर्ज दाखल करणा-या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रिया संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in याला भेट द्यावी तसेच महानगरपालिकेचे अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मिडीया अकाऊंटला भेट द्यावी आणि सत्य व प्रमाणित माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे याविषयी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला बळी पडू नये अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी