Thane Corona Death: मोठी बातमी! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठाणे: कोरोनाने पुन्हा एकदा आपली दहशत गाजवायला सुरुवात केली आहे. तीन वर्षापूर्वी पूर्ण जगात हाहाकार पसरवणाऱ्या या महामारीने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच, ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. ठाण्यात अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ही एक मोठी चिंतेची बाब असून,  यानंतर सर्वांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.



ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालं.  हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी होता, ज्याचा शनिवारी सकळी 6 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्याला 22 मे रोजी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.



मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ


मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण  झपाट्याने वाढत आहे. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही 185 पर्यंत पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत या रुग्णसंख्येत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे.



नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असे सांगितले जात आहे. सोबतच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे देखील आवाहन केले जात आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य