DC vs PBKS, IPL 2025: दिल्ली शेवट गोड करेल का?

  94

मुंबई(सुशील परब):  पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना जयपूर येथे खेळविण्यात येणार आहे. त्यांचा मागील सामना भारत-पाकिस्तान तणावामुळे रद्द करण्यात आला होता. पंजाब किंग्जने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र त्यांना फक्त पहिल्या स्थानासाठी विजय मिळवायचा असून पंजाब किंग्जचे पारडे जड आहे.


तसेच प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, नेहल वधेरा, श्रेयश अय्यर, शशांक सिंग असे फलंदाज त्यांच्याकडे असून या स्पर्धेत त्यांनी फलंदाजीत सातत्य राखले आहे. प्रभसिमरन सिंगने १२ सामन्यांत ४५८ धावा केल्या आहेत. तसेच तो चांगली फलंदाजी करून ऑरेंज कॅपसाठी प्रयत्न करेल.


पंजाब किंग्जची गोलंदाजी ही उत्तम असून युजवेंद्र चहल, हरप्रित ब्रार, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, कुलदीप सेन असे चांगले गोलंदाज आहेत. त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल प्लेऑफ मधून बाहेर आहेत ते पंजाब किंग्जला रोखण्याचा प्रयत्न करतील.


के. एल. राहुल, करुन नायर, डुप्लेसिस, अभिषेक पोरेल, स्टब्स, अक्षर पटेल असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत, तर टी नटराजन, मुकेश कुमार, मुस्ताफिजुर रहमान, कुलदीप यादव असे गोलंदाज आहेत. चला तर बघुया पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्स हरवते का?

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल