केरळ किनाऱ्यावर कंटेनर जहाज उलटले! धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने भारतीय तटरक्षक दल सतर्क

कोची : लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज MSC ELSA 3 केरळच्या विझिंजम बंदरातून निघाल्यानंतर कोचीच्या किनाऱ्याजवळ शनिवारी उलटले. या गंभीर सागरी दुर्घटनेने खळबळ उडवली आहे. जहाजावरील २४ क्रू मेंबर्सपैकी ९ जणांनी जहाज सोडले असून, उर्वरित १५ जणांसाठी बचावकार्य सुरू आहे.

ही घटना कोचीपासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात घडली. जहाजाने मदतीसाठी तातडीचा संदेश दिल्यानंतर भारतीय तटरक्षक दल (ICG) सक्रिय झाले आणि हवाई तसेच समुद्री बचाव मोहीम राबवू लागले.

बचाव मोहिमेत ICG कडून बचावासाठी जहाजं आणि विमाने तैनात केली असून जहाजाजवळ अतिरिक्त लाईफराफ्ट्स टाकण्यात आले आहेत. यात ९ जण लाईफराफ्टमध्ये सुरक्षित असून उर्वरित १५ जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जहाजावर काही धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर संभाव्य पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगली जात आहे.

नौवहन महासंचालनालय आणि भारतीय तटरक्षक दल यांनी जहाज व्यवस्थापनाला तातडीने मदतीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन