केरळ किनाऱ्यावर कंटेनर जहाज उलटले! धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने भारतीय तटरक्षक दल सतर्क

कोची : लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज MSC ELSA 3 केरळच्या विझिंजम बंदरातून निघाल्यानंतर कोचीच्या किनाऱ्याजवळ शनिवारी उलटले. या गंभीर सागरी दुर्घटनेने खळबळ उडवली आहे. जहाजावरील २४ क्रू मेंबर्सपैकी ९ जणांनी जहाज सोडले असून, उर्वरित १५ जणांसाठी बचावकार्य सुरू आहे.

ही घटना कोचीपासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात घडली. जहाजाने मदतीसाठी तातडीचा संदेश दिल्यानंतर भारतीय तटरक्षक दल (ICG) सक्रिय झाले आणि हवाई तसेच समुद्री बचाव मोहीम राबवू लागले.

बचाव मोहिमेत ICG कडून बचावासाठी जहाजं आणि विमाने तैनात केली असून जहाजाजवळ अतिरिक्त लाईफराफ्ट्स टाकण्यात आले आहेत. यात ९ जण लाईफराफ्टमध्ये सुरक्षित असून उर्वरित १५ जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जहाजावर काही धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर संभाव्य पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगली जात आहे.

नौवहन महासंचालनालय आणि भारतीय तटरक्षक दल यांनी जहाज व्यवस्थापनाला तातडीने मदतीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार