केरळ किनाऱ्यावर कंटेनर जहाज उलटले! धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने भारतीय तटरक्षक दल सतर्क

कोची : लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज MSC ELSA 3 केरळच्या विझिंजम बंदरातून निघाल्यानंतर कोचीच्या किनाऱ्याजवळ शनिवारी उलटले. या गंभीर सागरी दुर्घटनेने खळबळ उडवली आहे. जहाजावरील २४ क्रू मेंबर्सपैकी ९ जणांनी जहाज सोडले असून, उर्वरित १५ जणांसाठी बचावकार्य सुरू आहे.

ही घटना कोचीपासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात घडली. जहाजाने मदतीसाठी तातडीचा संदेश दिल्यानंतर भारतीय तटरक्षक दल (ICG) सक्रिय झाले आणि हवाई तसेच समुद्री बचाव मोहीम राबवू लागले.

बचाव मोहिमेत ICG कडून बचावासाठी जहाजं आणि विमाने तैनात केली असून जहाजाजवळ अतिरिक्त लाईफराफ्ट्स टाकण्यात आले आहेत. यात ९ जण लाईफराफ्टमध्ये सुरक्षित असून उर्वरित १५ जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जहाजावर काही धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर संभाव्य पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगली जात आहे.

नौवहन महासंचालनालय आणि भारतीय तटरक्षक दल यांनी जहाज व्यवस्थापनाला तातडीने मदतीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात