एक्सलो पॉइंटजवळ एटीएम फोडून १९ लाखांची चोरी

  27

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉईंटजवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून तब्बल १८ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. २२ मे) उघडकीस आली.


या प्रकरणी मयूर संजय महाजन (वय ३०, वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम विभागाचे मॅनेजर असून त्यांना गुरुवारी सकाळी त्यांच्या सफाई कर्मचाऱ्याने माहिती दिली की एक्सलो पॉईंटजवळील बँकेच्या एटीएम मशीनचे दरवाजे तुटलेले दिसत आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.


पोलिसांसमवेत महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तीन एटीएम मशीनपैकी एका मशीनचे दरवाजे गॅस कटरच्या सहाय्याने उघडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामधील रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. सदर मशीनमध्ये १९ मे रोजी एकूण १० लाख रुपये भरले गेले होते. यापूर्वी ग्राहकांनी १.१५ लाख रुपये काढले होते. तर मशीनमध्ये एकूण १८.७६ लाख रुपये शिल्लक होते. ही संपूर्ण रक्कम चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.


चोरीस गेलेल्या रकमेचे स्वरूप ५०० रुपयांच्या ३७५२ नोटांमध्ये असून, चोरी कधी झाली याबाबतचे अंदाजे वेळ रात्री १२ ते सकाळी १० दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शेवाळे हे या प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे गोळा करून तपासाची दिशा ठरवली जात आहे.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून