Term Insaurance : टर्म इन्शुरन्सचा क्लेम कधी नाकारला जाऊ शकतो ?

  43

कुटुंबाला सुरक्षा राहावी यासाठी बहुतांश मंडळी टर्म प्लॅनची निवड करतात. या टर्म पॉलिसीमुळं पॉलिसीधारकाच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. दाव्यानुसार पैसे मिळाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान होते. विमाधारकांचा अपघात, आजारपण, दुर्घटना या कारणांमुळं मृत्यू होऊ शकतो. मात्र, सर्वच मृत्यू प्रकरणाला विमा कवच असतेच असे नाही. विमा उतरवला की चिंता मिटली. प्रत्येक गोष्टीचा दावा अर्थात क्लेम मिळणार असं तुम्हाला वाटू शकत. पण तसं नाही. कोणत्या कोणत्या स्थितीमध्ये तुम्हाला दावा मिळणार नाही. याबाबतची माहिती या लेखातून जाऊन घेऊया...



धोकादायक साहस करणं


पॉलिसीधारकाचा धोकादायक साहस करताना मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅन नाकारू शकते. आयुष्याला जोखमीत टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टी यात येऊ शकतात. यात अॅडव्हेंचर स्पोर्टस्, मोटार रेस, स्काय डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, बंजी जंपिंग, मौत का कुआँ इत्यादी.



व्यसनामुळे मृत्यू


पॉलिसीधारक हा दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा अमली पदार्थ घेतले असेल आणि अपघातात त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅनची रक्कम देण्यास मनाई करू शकते.



एचआयव्ही


विमा कंपनी अशा प्रकरणात विमा कवच देणार नाही. जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू हा सेक्शुअल ट्रान्समिटेडच्या आजारपणामुळे होत असेल म्हणजेच एचआयव्ही/एड्सने होत असेल तर विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही.



हत्या


जर एखाद्या पॉलिसीधारकाची हत्या झाली आणि त्यात वारसाचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास किंवा त्याच्यावर हत्येचा आरोप असेल तर विमा कंपनी टर्म प्लॅनचा दावा मंजूर करत नाही. अशावेळी क्लेम रिक्वेस्ट पेंडिंग ठेवली जाते. जोपर्यंत नॉमिनीला क्लीन चिट मिळत नाही किंवा तो निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत पॉलिसीची रक्कम दिली जात नाही. याशिवाय पॉलिसीधारक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल आणि त्याची हत्या झाली असेल तर विम्याची रक्कम मिळत नाही.


Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये