आजीच्या कुशीत वैष्णवीचं बाळ

वैष्णवीचं बाळ कस्पटेंच्या घरात सुरक्षित


अवघ्या २४ वर्षीय वैष्णवीचा लग्नानंतर दोन वर्षातच दुर्दैवी अंत झाला. पैशाच्या हव्यासापोटी एका लेकीचा बळी गेला. चिमुकला जीव पोरका झाला. त्याचा लवकर ताबा मिळावा, यासाठी माहेरच्यांचा जीव कासावीस होत होता. अखेर पाच दिवसांच्या अश्रूंनंतर वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाला आजीच्या कुशीत विसावण्याची जागा मिळाली. आमची मुलगी गेली... पण तिची माया परत आली, अशा भावनांनी भारावलेल्या वैष्णवीच्या आई स्वाती कस्पटे यांनी नातवाला मिठीत घेतलं. बाळाला पाहून कस्पटे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले...


?si=qWXfNHl9mZuFj7HZ

ही कहाणी आहे वैष्णवी शशांक हगवणे या २४ वर्षीय विवाहितेची. जिनं आयुष्यातील सगळी स्वप्नं एका धाग्यात गुंफली. मात्र, १७ मे रोजी तिनं गळफास घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही, तर छळ करून केलेला घात होता, असा आरोप तिच्या पालकांनी केला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा दहा महिन्यांचा चिमुरडा जनकराजे पोरका झाला. यातील त्रासदायक बाब म्हणजे तिच्या मृत्यूनंतर बाळाचा पत्ता लागू शकत नव्हता. पाच दिवसांपासून त्या बाळाचा ठावठिकाणा नव्हता. अचानक एका अनोळखी व्यक्तीनं बाळाची आजी स्वाती कस्पटे यांना फोन करून तुम्ही शोधत असलेले बाळ माझ्याकडे आहे, असं सांगितलं. हा फोन कॉल म्हणजे अंधारात आशेचा एक टिमटिमता दिवा होता. त्या व्यक्तीनं बाळ घेण्यासाठी बाणेर इथं महामार्गावर बोलावलं. तिथं गेल्यावर चिमुकल्या जनकराजेला आजीच्या स्वाधीन केलं. तो व्यक्ती निघून गेला. बाळ आजी-आजोबांच्या खुशीत सुखरूप आले.


बाळाचे आजोबा अनिल कस्पटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, केवळ आमचं नातवंड नाही, ती आमची वैष्णवी आहे. तिची आठवण, तिची सावली आमच्यासोबत आहे. आम्ही त्याचं बालपण प्रेमानं, काळजीनं फुलवणार आहोत. त्याला आता कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही...

Comments
Add Comment

मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल मुरबाड : मुरबाड तालुक्यातील

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भाजपचा शिवसेनेला धक्का!

सत्ता गेली; शिवसेनेचे मोठे नेते प्रवीण राऊत यांचे भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत बदलापूर : मुंबई महापालिकेसह

उल्हासनगर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्तेसाठी 'सेटिंग'

वंचितचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवले उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीनंतर उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी खऱ्या

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद