प्रहार    

वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे बापलेकाला अटक

  66

वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे बापलेकाला अटक

पुणे : पैशांसाठी सतत छळणाऱ्या हगवणे कुटुंबाच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आज म्हणजेच शुक्रवार २३ मे रोजी हगवणे बापलेकाला अटक केली. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली.


राजेंद्र आणि सुशील एका हॉटेलमध्ये जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या हाती आले. फूटेजमध्ये राजेंद्र आणि सुशील हॉटेलमध्ये मटण खाताना दिसत होते. यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई केली. झोपेत असलेल्या हगवणे बापलेकाला जागं करुन पहाटे साडेचार वाजता अटक केली. दोघांना तातडीने पोलीस उपायुक्त कार्यालयात नेण्यात आले. पोलीस दोघांनाही पुढील २४ तासांत न्यायालयात हजर करणार आहेत.


वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. काल रात्री राजेंद्र यांचा भाऊ संजय हगवणेला अटक करण्यात आले. वैष्णवीने छळाला वैतागून टोकाचे पाऊल उचलल्याची बातमी येताच राष्ट्रवादी काँग्रेसने हगवणे कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी वैष्णवीच्या आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, असे जाहीर केले. यानंतर सूत्रं वेगाने फिरली. आतापर्यंत वैष्णवी हगवणे प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे म्हणजेच कस्पटे दांपत्याकडे देण्यात आला आहे.


पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

‘खड्डे असतील, तर टोल नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू मुंबई : केरळ राज्यातील एका

पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या

मिठी नदीच्या घोटाळ्यातील तिसरा आरोपी अटकेत!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चालू तपासात एक मोठी प्रगती झाली आहे. मुंबई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयके मंजूर महिनाभरात फक्त ३७ तास चर्चा नवी दिल्ली : महिनाभर चाललेल्या अधिवेशनात

बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा