वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिराला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पैशांसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीचा मृतदेह औंध रुग्णालयात पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणण्यात आला होता. हे प्रकरण चिघळणार आणि अटक होणार याची जाणीव झाल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी राजेंद्र आणि सुशीलला २३ मे रोजी मध्यरात्री पुण्याच्या स्वारगेट परिसरातून झोपेतून उठवून पकडले होते. पकडल्यानंतर आज म्हणजेच शुक्रवार २३ मे रोजी दुपारी राजेंद्र आणि सुशीलला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. चौकशीसाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली. कोर्टाने ही बाब विचारात घेतली आणि राजेंद्र आणि सुशीलला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

वैष्णवी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. वैष्णवीला पती शशांकने पाईपने मारहाण केल्याचे पोलीस तपासातून कळले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या गुन्ह्यात ११८ (२) कलमवाढ केली आहे. मारहाणीचा प्रकार पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कलमवाढ केली आहे. ज्या पाईपने वैष्णवीला मारहाण केली होती तो पाईप जप्त केल्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितले.

तपास सुरू आहे. चौकशीतून हाती येणाऱ्या माहितीआधारे पुढील तपास केला जाईल. आरोपींची मदत कोणी केली होती का ? याचाही तपास सुरू आहे. तपासातून हाती येणाऱ्या माहितीआधारे आरोपींविरोधात कलमवाढ होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. कस्पटे कुटुंबाने वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबाला दिलेली फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात बांधकामस्थळी अल्पवयीन मुलाचा अपघाती मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरू

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झाले. आणि प्रश्न निर्माण

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पूर्व उपनगराला १८ वर्षांनंतर लाभला महापौर

मुंबई :  मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या