शिरढोण, खोणी येथील सदनिकांच्या किमतीत कपात

मुंबई: कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) सन २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढण्यात आलेल्या सोडतीतील मौजे शिरढोण (ता.कल्याण, जि.ठाणे) व मौजे खोणी (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील ०६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मौजे शिरढोण येथील सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील मौजे शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५२३६ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आकरण्यात येणार आहे, असे गायकर यांनी सांगितले.

तसेच मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील अत्यल्प उत्पन्न गटातील १०१२ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ०१ हजार ८०० रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये असणार आहे.


Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये