शिरढोण, खोणी येथील सदनिकांच्या किमतीत कपात

  33

मुंबई: कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) सन २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढण्यात आलेल्या सोडतीतील मौजे शिरढोण (ता.कल्याण, जि.ठाणे) व मौजे खोणी (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील ०६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मौजे शिरढोण येथील सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील मौजे शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५२३६ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आकरण्यात येणार आहे, असे गायकर यांनी सांगितले.

तसेच मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील अत्यल्प उत्पन्न गटातील १०१२ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ०१ हजार ८०० रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये असणार आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या