RCB vs SRH, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीचा ४२ धावांनी लाजिरवाणा पराभव

  86

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीगच्या ६५ नंबरच्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यांना सनरायजर्स हैदराबादने ४२ धावांनी हरवले. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २३१ धावा केल्या होत्या. आरसीबीसमोर विजयासाठी २३२ धावांचे आव्हान होते. मात्र त्यांना हे आव्हान पेलवले नाही आणि आरसीबीला केवळ ९ बाद १८७ धावाच करता आल्या.


आरसीबीसाठी विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी चांगली सुरूवात करून दिली. फिल साल्टने ६२ धावा तर विराट कोहलीने ४३ धावांची खेळी केली. मात्र ही भागीदारी संघाला विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही. या दोघांना वगळता कर्णधार जितेश शर्माने २४ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने त्यांना लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना लखनऊच्या मैदानावर रंगला होता. हैदराबादने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २३१  धावा केल्या होत्या.

हैदराबादकडून इशान किशनने तुफानी खेळी केली. इशान किशनने ४८ बॉलमध्ये ९४  धावांची तुफानी खेळी केली. सनरायजर्स हैदराबादची सुरूवात तुफानी झाली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा ३४ धावा करून बाद झाला. तर हेडला भुवनेश्वर कुमारने बाद केले. अभिषेक-हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन आणि इशान किशनने डाव सांभाळला. यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. स्पिनर सुयश शर्माने क्लासेनला बाद करत ही भागीदारी तोडली. क्लासेनने दोन षटकार आणि तितक्याच चौकाराच्या मदतीने १२ बॉलवर २४ धावा केल्या.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल