अटक टाळण्यासाठी वैष्णवी हगवणेचा सासरा कुठे कुठे लपला ?

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. याआधी ७ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह औंध रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आला. या प्रकरणात अटक होईल याची जाणीव झाल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात एन्डेवर कारने आलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील दोघे जाताना तिथून थार घेऊन निघाले होते. नंतर थार मधूनच त्यांनी मुहूर्त लॉन्स, पवना डॅम जवळील बंडू फाटक फार्म हाऊस येथे मुक्काम केला. नंतर थार १८ मे रोजी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात होती. तिथेही काही काळ मुक्काम झाला.

आरोपींनी १९ मे रोजी थार ऐवजी बोलेरो वापरण्याचा निर्णय घेतला. दोघे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पळून गेले. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला. सेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये जाऊन २० मे रोजी थांबले होते. प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी २१ मे रोजी मुक्काम केला. पुन्हा २२ मे रोजी ते पुण्यात पोहोचले.

पोलिसांना सतत हुलकवणी देत असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील निवांतपणे हॉटेलमध्ये मटण पार्टी झोडत होते. पोलिसांना आरोपी मटण खात असतानाचे एक सीसीटीव्ही फूटेज मिळाले. या फूटेजच्या मदतीने चौकशी करत पोलीस आरोपींचा माग काढू लागले. अखेर दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून मध्यरात्री पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

फॅमिली पेन्शनसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

युद्ध पुन्हा पेटले! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात १०४ पॅलेस्टिनी नागरिक ठार

ट्रम्प यांच्या मध्यस्थी नंतरही शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन Gaza war : गाझा पट्टीमध्ये रात्री झालेल्या हवाई

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा