अटक टाळण्यासाठी वैष्णवी हगवणेचा सासरा कुठे कुठे लपला ?

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. याआधी ७ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह औंध रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आला. या प्रकरणात अटक होईल याची जाणीव झाल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात एन्डेवर कारने आलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील दोघे जाताना तिथून थार घेऊन निघाले होते. नंतर थार मधूनच त्यांनी मुहूर्त लॉन्स, पवना डॅम जवळील बंडू फाटक फार्म हाऊस येथे मुक्काम केला. नंतर थार १८ मे रोजी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात होती. तिथेही काही काळ मुक्काम झाला.

आरोपींनी १९ मे रोजी थार ऐवजी बोलेरो वापरण्याचा निर्णय घेतला. दोघे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पळून गेले. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला. सेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये जाऊन २० मे रोजी थांबले होते. प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी २१ मे रोजी मुक्काम केला. पुन्हा २२ मे रोजी ते पुण्यात पोहोचले.

पोलिसांना सतत हुलकवणी देत असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील निवांतपणे हॉटेलमध्ये मटण पार्टी झोडत होते. पोलिसांना आरोपी मटण खात असतानाचे एक सीसीटीव्ही फूटेज मिळाले. या फूटेजच्या मदतीने चौकशी करत पोलीस आरोपींचा माग काढू लागले. अखेर दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून मध्यरात्री पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग