मान्सूनपूर्व घरांच्या छप्पर दुरुस्तीला वेग

  40

घरांवर ताडपत्री, लाकुडफाटा भरण्याची घाई


मोखाडा :मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची गती वाढली असून कामांना वेग आला आहे.सध्या मान्सूनपूर्व पाऊस सायंकाळच्या वेळेला वीज, वारा यांच्यासह हजेरी लावत आहे.दरम्यान या पावसात आपल्या घरात कुठे गळतंय यासाठी घराच्या डागडुजी सह प्लास्टिक ताडपत्री टाकणे, जुनी कौलं काढून नवीन कौलं टाकणे,पावसाळ्यात जनावरांसाठी वैरण, लाकुडफाटा गोळा करून ठेवणे इत्यादी कामाची घाई तालुक्याच्या ग्रामीण भागात होताना दिसत आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश घरे कौलारू आहेत तर काही घरांवर सिमेंटचे पत्रे असतानाही पावसाळ्यात पाणी गळते यामुळे या घरांवर तसेच जनावरांचा चारा खराब होऊ नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी होताना दिसत आहे.रोहिणी नक्षत्र सुरू होण्यास अवघे दोन तीन दिवस राहिले असून हवामान खात्याने सुद्धा येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केलेला असल्याने वारा, वादळ आणि जोरदार पावसापासून वाचण्यासाठी, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मान्सून पूर्व कामांना ग्रामीण भागात वेग आला आहे.घरांवर आच्छादन टाकण्यासाठी बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक येत आहेत तर काही ग्रामस्थांनी आपल्या घरांवरील जुनी कौलं काढून त्या जागी नवीन कौल टाकण्याची लगबग सुरू केली आहे. छतावरील पाणी गळती थांबविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिकच्या दरात जरी वाढ होत असली तरी पावसाळ्यात पावसापासून संरक्षण देणाऱ्या आवश्यक प्लास्टिक व ताडपत्री विकत घेऊन घरांची डागडुजी करण्याची लगबग ग्रामीण भागात वाढली आहे.
Comments
Add Comment

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या

आरक्षण बदलाचा ‘गेम’ सर्वाधिक चर्चेत

पवार, रेड्डींचा मोठा प्रताप फसला गणेश पाटील विरार : बांधकाम परवानगी देताना लाच स्वीकारण्यासाठी 'रेट' ठरवून मलिदा

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने