भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण हक्क, ऑपरेशन सिंदूरवर भारताला मिळाला जर्मनीचा पाठिंबा

नवी दिल्ली: दहशतवादाविरुद्ध लाँच केलेल्या भारताच्या सिंदूर ऑपरेशनला जर्मनीने पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी सांगितले की दहशतवादाविरुद्ध भारताला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासोबतच त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.


ते म्हणाले, आम्ही २२ एप्रिलला भारतावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने स्तब्ध झालोत. नागरिकांवर झालेल्या या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. आमच्या संवेदना पीडितांसोबत आहेत. भारताला निश्चितच दहशतवादाविरुद्ध स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे.



काय म्हणाले एस जयशंकर?


मी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या भारताच्या प्रतिक्रियेनंतर लगेचच बर्लिनला आलो आहे. भारत दहशतवाद कधीच सहन करणार नाही. भारत कधीही अण्वस्त्र धमकीला बधणार नाही आणि भारत पाकिस्तानसोबत पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने व्यवहार करेल. या संबंधात कोणत्याही प्रकारचा भ्रम नसला पाहिजे. आम्ही जर्मनीच्या भूमिकेलाही महत्त्व देतो. प्रत्येक देशाला दहशतवादाविरुद्ध स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली