भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण हक्क, ऑपरेशन सिंदूरवर भारताला मिळाला जर्मनीचा पाठिंबा

नवी दिल्ली: दहशतवादाविरुद्ध लाँच केलेल्या भारताच्या सिंदूर ऑपरेशनला जर्मनीने पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी सांगितले की दहशतवादाविरुद्ध भारताला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासोबतच त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.


ते म्हणाले, आम्ही २२ एप्रिलला भारतावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने स्तब्ध झालोत. नागरिकांवर झालेल्या या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. आमच्या संवेदना पीडितांसोबत आहेत. भारताला निश्चितच दहशतवादाविरुद्ध स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे.



काय म्हणाले एस जयशंकर?


मी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या भारताच्या प्रतिक्रियेनंतर लगेचच बर्लिनला आलो आहे. भारत दहशतवाद कधीच सहन करणार नाही. भारत कधीही अण्वस्त्र धमकीला बधणार नाही आणि भारत पाकिस्तानसोबत पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने व्यवहार करेल. या संबंधात कोणत्याही प्रकारचा भ्रम नसला पाहिजे. आम्ही जर्मनीच्या भूमिकेलाही महत्त्व देतो. प्रत्येक देशाला दहशतवादाविरुद्ध स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या