देवळा नगरपंचायतीची प्लास्टिक पिशवी कारवाई

  26

देवळा : स्वच्छ सर्वेक्षण २०२५, माझी वसुंधरा ५.० अंतर्गत व एकल वापर प्लास्टीक बंदी अंमलबजावणी मोहीम अंतर्गत देवळा शहरात प्लास्टीक जप्तीची कारवाई करण्यात आली. यात २० किलो प्लास्टीक देवळा नगरपंचायतीने विविध विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आले असून रुपये ४०००/-इतका दंड दुकानदारांकडून वसूल करण्यात आला. ही मोहीम सुरुच राहणार असून प्लास्टीक वितरण व वितरक दुकानदारांवर यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल, असे देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी कळविले आहे.


एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून एकल वापर प्लास्टीक बंदी अंमलबजावणी मोहीम राबविण्याच्या सूचना आहेत. या अनुषंगाने देवळा नगरपंचायतीने सदर मोहीम राबविली. यात शहरातील विक्रेते, फुलविक्रेते, स्थानिक बाजारपेठेत, भाजीपाला मंडई दुकाने या ठिकाणी एकल वापर प्लास्टिक जप्ती व बंदी करण्याची मोहीम राबविली. या तसेच एकल वापर प्लास्टिक वापर न करण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्या आहेत.


ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहणार असून प्लास्टीक वितरण व वितरक दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीने कळविले आहे. ही कारवाई मोहीम मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, यांच्या मार्गदर्शनानुसार,स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, कार्यालयीन अधीक्षक पवन कस्तुरे, लेखापाल नितीन भवर , कर निरीक्षक जनार्दन येवले , शहर समन्वयक दिग्विजय देवरे, लेखापरीक्षक जुगल घुगे, शरद पाटील, विकास आहेर,व वसुली कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने राबवली.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून