महामुंबई

पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकरांचे योगदान

  25

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संवेदनशीलतेला, दातृत्वाला नमन


मुंबई :डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करून ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले.पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली.


सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर व्यक्तीचे नाव असून करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील रहिवासी आहेत.


आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, ना कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले आणि करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.



पत्नीच्या स्मरणार्थ कमाईचा भाग समाजाला समर्पित


सदानंद करंदीकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात राहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाइकांची धावपळ व पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर यांनी जवळून पाहिली. त्यामुळे पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला.


अध्यात्मात व शेतीत रस असलेल्या करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख व पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.


सागराप्रमाणेच दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध


करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. ते त्यांच्या भगिनी प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे वास्तव्यास आहेत. वृद्धाश्रम, कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबीयांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र करंदीकर यांनी सागराप्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

सर्व विभागांनी समन्वयाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात - आदिती तटकरे

मुंबई : विविध विभागामार्फत महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना सर्व विभागांनी

राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार - मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत

Weather Update: राज्यात हवामानाची गती मंदावली, काही ठिकाणी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व हवामानाची गती मंदावली असून, राज्यात पावसाचा जोर १० ते १२ जूनदरम्यान कमी-अधिक