देवगडमध्ये मासेमारीला ‘ब्रेक’

खोल समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांना आवाहन


देवगड : मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागाला चांगलेच झोडपल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात असलेली मासेमारी सध्या थंडावली आहे. पावसामुळे येथील बंदरात मच्छीमारी नौका थांबून होत्या. पावसामुळे खाडीकिनारच्या रस्त्यावर तसेच परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही कसरत करीत आपली वाहने हाकावी लागत होती. दरम्यान, मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागात जोर धरल्याने समुद्रात वेगाने हालचाली सुरू आहेत. किनारी भागात वादळसदृश स्थिती निर्माण होण्याच्या तसेच समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे मच्छीमारी नौका येथील बंदरात थांबून होत्या. त्यामुळे स्थानिक मच्छीमारी थंडावली आहे.


विशेषत: छोट्या मच्छीमारांना याचा अधिक त्रास जाणवतो. वाऱ्यामुळे छोटे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळतात. तसेच समुद्रातील बदलते वातावरण असल्याने ट्रॉलर घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळले जात आहे. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे किनारी भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. खाडीकिनारी भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकांनाही त्याचा त्रास जाणवत आहे. खाडीकिनारी सध्या मच्छीमारांची धांदल सुरू आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक