देवगडमध्ये मासेमारीला ‘ब्रेक’

खोल समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांना आवाहन


देवगड : मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागाला चांगलेच झोडपल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात असलेली मासेमारी सध्या थंडावली आहे. पावसामुळे येथील बंदरात मच्छीमारी नौका थांबून होत्या. पावसामुळे खाडीकिनारच्या रस्त्यावर तसेच परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही कसरत करीत आपली वाहने हाकावी लागत होती. दरम्यान, मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागात जोर धरल्याने समुद्रात वेगाने हालचाली सुरू आहेत. किनारी भागात वादळसदृश स्थिती निर्माण होण्याच्या तसेच समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे मच्छीमारी नौका येथील बंदरात थांबून होत्या. त्यामुळे स्थानिक मच्छीमारी थंडावली आहे.


विशेषत: छोट्या मच्छीमारांना याचा अधिक त्रास जाणवतो. वाऱ्यामुळे छोटे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळतात. तसेच समुद्रातील बदलते वातावरण असल्याने ट्रॉलर घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळले जात आहे. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे किनारी भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. खाडीकिनारी भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकांनाही त्याचा त्रास जाणवत आहे. खाडीकिनारी सध्या मच्छीमारांची धांदल सुरू आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :