वणीत तिरंगा रॅलीत देशभक्तीचे अनोखे दर्शन

  20

वणी : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिकांनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवित उस्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या सन्मानार्थ वणी येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध समाजघटक, संस्था, संघटनांंचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेत देशप्रेम व एकतेचा संदेश दिला. रॅलीत डिजेवर देशभक्तीपर लावलेली गिते व भारतमाता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रॅली देवी मंदीर चौक, शनि मंदीर, महाराणा प्रताप चौक, शिंपी गल्ली, संताजी चौक, पोलिस स्टेशन, बसस्थानक मार्गे काढण्यात येवून छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता झाली. यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदुरची माहिती देत संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, उपसरपंच विलास कड, प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव केला. राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली. रॅलीत उपसरपंच विलास कड, वमकोचे अध्यक्ष महॆंद्र बोरा, भाजपाचे वणी मंडल प्रमुख वसंत कावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाप्रमुख राजेंद्र उफाडे, आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख प्रा. अशोक बागूल, किरण गांगुर्डे, बाळासाहेब घडवजे, प्रवीण दोशी, दिगंबर पाटोळे, अनिल गांगुर्डे, किशोर बोरा, नितीन झोटिंग, शाम मुरकुटे, कदम, बाळासाहेब देशमुख, ज्योती देशमुुख, कृष्णा मातेरे, सचिन कड, तुषार शर्मा, नामदेव पैठणे, रितेश पारख आदीसंह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांची मागणी नाशिक : मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे. या

कळवण तालुक्यातील अवकाळी पंचनाम्यांचा अहवाल सादर

नुकसान भरपाईसाठी लागणार १ कोटी रु. कळवण : वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील ९२ गावांमधील

केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे आजपासून उत्कर्ष महोत्सव

नाशिक : केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि

‘मलनिस्सारण’ ची शासनाकडून शहानिशा

प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या

भारताला पहिले तेजस एमके-१ए जूनमध्येच मिळणार

नाशिक : भारतीय हवाई दलाला पहिले स्वदेशी तेजस एमके-१ए लढाऊ विमान जून २०२५ मध्येच मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात

ड्यूटी संपल्यामुळे वैमानिकाने दिला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान उडवण्यास नकार!

एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर २० मिनिटे रखडले जळगाव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव