शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये काय घडलं ? कसं जप्त झालं कोट्यवधींचं घबाड ?

धुळे : गुलमोहर शासकीय विश्रामगृहातून पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचा आरोप उद्धव गटाने केला आहे. कंत्राट देण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडूनच लाच घेण्यात आली. ही रक्कम एका आमदाराने पीएच्या हाती सोपवण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले होते. आमदाराच्या सांगण्यावरुन कंत्राटदार रोख रक्कम घेऊन आला. पण आयत्यावेळी पोलिसांनी धाड टाकून रक्कम जप्त केली. जप्त केलेली रक्कम एकूण ११ आमदारांमध्ये वाटण्याचे नियोजन होते असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. ज्या खोलीतून रक्कम जप्त झाली ती खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावावर नोंदवलेली होती, असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. उद्धव गटाचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी फेटाळला आहे. महाराष्ट्र शासन आणि राज्यातील आमदारांच्या समितीला बदनाम करण्यासाठी उद्धव गटानेच एक खेळी केल्याचा संशय आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाची अंदाज समिती तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात आहे. धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा ही समिती घेणार आहे. समितीत २९ आमदार आहेत. या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. खोतकरांसह समितीचे ११ आमदार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच आमदारांना लाच म्हणून देण्यासाठी पाच कोटींची रोकड गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा आरोप उद्धव गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. तर ठोस पुरावे नसताना फक्त आरोपांची राळ उडवून देणे ही माजी आमदार गोटेंची जुनी खोड असल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे उद्धव गटाच्या उपस्थितीत खोली क्रमांक १०२ ला कुलुप लावण्यात आले. पोलीस आल्यावर उद्धव गटाच्या उपस्थितीतच हे कुलुप काढून खोलीत तपासणी करण्यात आली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पाच कोटींची रोकड आल्याचा आरोप केला. पण खोलीतून पोलिसांनी एक कोटी ८४ लाख २०० रुपये एवढीच रोकड जप्त केली आहे. खोलीत एवढेच पैसे होते, असे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment

विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर : ‘मनात मांडे, पदरात धोंडे’, अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीला ती तंतोतंत

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अव्वल'

नागपूर : "विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे. पण, राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी

मनिष तिवारींनी व्हिप विरोधात सादर केले खासगी विधेयक

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार मनिष तिवारींनी व्हिप अर्थात पक्षादेशाविरोधात खासगी विधेयक सादर केले आहे. हे विधेयक

इंडिगोचा मंत्री, आमदारांनाही फटका, हिवाळी अधिवेशनाला कसे राहणार हजर ?

नागपूर : इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही बसण्याची शक्यता आहे. अनेक मंत्री आणि

नागपूरमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार ?

नागपूर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण होणार होते मुख्यमंत्री ? नितेश राणेंनी केला गौप्यस्फोट

पिंपरी : ‘विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन