शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये काय घडलं ? कसं जप्त झालं कोट्यवधींचं घबाड ?

धुळे : गुलमोहर शासकीय विश्रामगृहातून पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचा आरोप उद्धव गटाने केला आहे. कंत्राट देण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडूनच लाच घेण्यात आली. ही रक्कम एका आमदाराने पीएच्या हाती सोपवण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले होते. आमदाराच्या सांगण्यावरुन कंत्राटदार रोख रक्कम घेऊन आला. पण आयत्यावेळी पोलिसांनी धाड टाकून रक्कम जप्त केली. जप्त केलेली रक्कम एकूण ११ आमदारांमध्ये वाटण्याचे नियोजन होते असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. ज्या खोलीतून रक्कम जप्त झाली ती खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावावर नोंदवलेली होती, असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. उद्धव गटाचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी फेटाळला आहे. महाराष्ट्र शासन आणि राज्यातील आमदारांच्या समितीला बदनाम करण्यासाठी उद्धव गटानेच एक खेळी केल्याचा संशय आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाची अंदाज समिती तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात आहे. धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा ही समिती घेणार आहे. समितीत २९ आमदार आहेत. या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. खोतकरांसह समितीचे ११ आमदार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच आमदारांना लाच म्हणून देण्यासाठी पाच कोटींची रोकड गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा आरोप उद्धव गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. तर ठोस पुरावे नसताना फक्त आरोपांची राळ उडवून देणे ही माजी आमदार गोटेंची जुनी खोड असल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे उद्धव गटाच्या उपस्थितीत खोली क्रमांक १०२ ला कुलुप लावण्यात आले. पोलीस आल्यावर उद्धव गटाच्या उपस्थितीतच हे कुलुप काढून खोलीत तपासणी करण्यात आली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पाच कोटींची रोकड आल्याचा आरोप केला. पण खोलीतून पोलिसांनी एक कोटी ८४ लाख २०० रुपये एवढीच रोकड जप्त केली आहे. खोलीत एवढेच पैसे होते, असे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींना मोठा झटका; मतदार यादीतून थेट ९०.६६ लाख नावे वगळली

- निवडणूक आयोगाकडून जिलानिहाय आकडेवारी जाहीर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेत (एसआयआर)

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या