ई-रिक्षाच्या प्रवासासाठी आता नियमावली

माथेरान : ई-रिक्षाची सेवा उपलब्ध झाल्यापासून माथेरानला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. सुरक्षित, स्वस्त आणि कमी वेळात जाण्याची सोय सर्वांना लाभल्याने या सेवेचा अधिक लाभ घेतला जात आहे.

केवळ वीस ई-रिक्षा कार्यरत असून दरदिवशी दोन ते तीन रिक्षांना दुरुस्तीसाठी अथवा चार्जिंगला लावले जाते त्यामुळे कमी रिक्षांमुळे पर्यटकांना तासंनतास ताटकळत उभे राहावे लागते. स्थानिक प्रवासी आणि वेळप्रसंगी त्यांचे पाहुणे असल्यास त्याचप्रमाणे नियमितपणे येणारा परिसरातील व्यावसायिक, व्यापारी वर्ग सुद्धा स्थानिकांच्या लाईनीत पटकन रिक्षातून निघून जातात त्यामुळे अनेकदा स्थानिक आणि पर्यटकांमध्ये वाद होतात. यावर तोडगा काढण्यासाठी संघटनेने येथील माथेरान बचाव संघर्ष समितीशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य निघावा यासाठी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात आला असून एक नियमावली तयार करण्यात आली आहे.



त्याबाबतची अंमलबजावणी २४ मेपासून लागू करण्यात येणार आहे. जे स्थानिक लोक आहेत, ज्यांच्याकडे माथेरान रहिवासी पुरावा आहे अशांना स्थानिकांच्या लाईनीत टोकन दिले जाणार आहे. जे जे शासकीय अधिकारी आहेत ज्यांना ही सेवा मोफत उपलब्ध केली जाते त्यांनाही त्यांच्या कार्यालयापर्यंत न सोडता स्टेशन जवळील ई-रिक्षा स्टँडवर उतरावे लागणार आहे.

ह्या नियमावलीमुळे पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागणार नसून सर्वांना उत्तमरीत्या प्रवास करता येईल.
Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित