वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. पण वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरची माणसंच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हगवणे कुटुंबाचा पक्षाशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत, असेही ते म्हणाले.

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबातील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वैष्णवीचा मुलगा जेमतेम नऊ महिन्यांचा आहे. नातवाचा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तुल दाखवून धमकावले, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला आठवडा उलटला तरी नातवाचा ताबा मिळालेला नाही. आता नातवाला सुरक्षितरित्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांनी त्यांच्या शिरावर घ्यावी, अशी भूमिका वैष्णवीच्या वडिलांनी जाहीररित्या घेतली आहे.

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांकरिता वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. पती शशांक हा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वारंवार वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.
Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण