केरळात मान्सूनचे आगमन ४ ते ५ दिवसात

पुणे : नैऋत्य मोसमी वारे वेगाने भारतीय भूभागाकडे प्रवास करीत असून, येत्या ४ ते ५ दिवसात ते देवभूमी केरळात दाखल होतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.


अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी लगत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, त्याचे बुधवारी कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे.याशिवाय दक्षिण कर्नाटक व आसपासच्या परिसरात हवेची द्रोणीय स्थिती आहे.बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश, तामिळनाडू लगत हवेची द्रोणीय स्थिती आहे.यामुळे मान्सून च्य वाऱ्यांना गती मिळत असून, त्यांनी श्री लंकेचा बहुतांश भाग, दक्षिण अरबी समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागराचा भाग व्यापला आहे. वाऱ्यांची घोड दौड सुरूच असून, येत्या 4 ते 5 दिवसात ते केरळात पोहोचतील.


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तसेच द्रोणीय स्थितीमुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होत आहे. मंगळवारी कर्नाटक तसेच केरळच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली.गेले ५ दिवस केरळात पाऊस सुरूच असल्याने लवकरच मान्सून केरळ मध्ये दाखल होणार असल्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्र पासून ते केरळ पर्यंत येत्या सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. अनेक भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसात काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.


मंगळवारी पुणे शहर आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस झाला. झाडे कोसळणे , रस्त्यावर पाणी साठले, गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.3 ठिकाणी होर्डिंग्ज कोसळली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.पुणे विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने रन वे वर पाणी साचले.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात