बुमराहची एन्ट्री मुंबई इंडियन्ससाठी फलंदायी

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये प्ले ऑफ राउंडसाठी अर्थात पुढील फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या चार संघांचा समावेश आहे. यापैकी मुंबईचे आतापर्यंत १३ साखळी सामने झाले आहेत. यातील आठ सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा संघ पाच सामन्यांत हरला आहे. यामुळे गुणतक्त्यात १६ गुणांसह मुंबई चौथ्या स्थानी आहे. दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर मुंबई चौथ्या स्थानी पाय घट्ट रोवून उभी आहे. मुंबईची सरासरी धावगती (नेट रनरेट) +१.२९२ आहे. मुंबईच्या या कामगिरीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची महत्त्वाची भूमिका आहे.


दुखापतीमुळे मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. या सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला. पण बुमराह परतला आणि मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत सुधारणा झाली. यामुळे जसप्रीत बुमराहची एन्ट्री मुंबई इंडियन्ससाठी फलंदायी ठरली आहे.



मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२५ मधील कामगिरी



  1. २३ मार्च - चेन्नई सुपरकिंग्सचा चार गडी राखून विजय - बुमराह खेळला नाही

  2. २९ मार्च - गुजरात टायटन्सचा ३६ धावांनी विजय - बुमराह खेळला नाही

  3. ३१ मार्च - कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून विजय - बुमराह खेळला नाही

  4. ४ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्सचा १२ धावांनी विजय - बुमराह खेळला नाही

  5. ७ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १२ धावांनी विजय - बुमराह खेळला; दुखापतीतून सावरला पण सामन्यात प्रभाव दिसला नाही

  6. १३ एप्रिल - दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी विजय - बुमराह खेळला; एक बळी घेतला

  7. १७ एप्रिल - हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून विजय - बुमराह खेळला; एक बळी घेतला

  8. २० एप्रिल - चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून विजय - बुमराह खेळला; दोन बळी घेतले

  9. २३ एप्रिल - हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून विजय - बुमराह खेळला; एक बळी घेतला

  10. २७ एप्रिल - लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी विजय - बुमराह खेळला; चार बळी घेतले

  11. १ मे - राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १०० धावांनी विजय - बुमराह खेळला; दोन बळी घेतले

  12. ६ मे - गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून डकवर्थ लुईसने विजय - बुमराह खेळला; दोन बळी घेतले

  13. २१ मे - दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५९ धावांनी विजय - बुमराह खेळला; तीन बळी घेतले


Comments
Add Comment

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन