IPL 2025 : दिल्लीच्या पराभवासह आयपीएलच्या प्लेऑफमधील ४ संघ निश्चित, कोण कोणाशी लढणार यावर सस्पेन्स

  160

मुंबई: आयपीएल २०२५मध्ये बुधवारी मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५९ धावांनी मात दिली. या विजयासह मुंबई आता प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. गुजरात, पंजाब आणि आरसीबी यांनी आधीच क्वालिफाय केले आहे. आता मुंबईचे नाव यात जोडले गेले आहे. चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात टक्कर होती. मात्र मुंबईने हा सामना जिंकत प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे.



प्ले ऑफमध्ये आता हे संघ


प्लेऑफमधील चार संघ आता ठरले आहेत. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि आरसीबी या संघांनी आधीच स्थान मिळवले होते. चौथ्या नंबरसाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात लढाई होती. मुंबईचे १४ गुण होते तर दिल्लीचे १३ गुण होते. दोन्ही संघांचे २-२ गुण शिल्लक आहेत. या सामन्यानंतर आता मुंबईने प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे. कारण १३ सामन्यानंतर त्यांचे १६ गुण आहेत. दिल्लीने जरी पुढचा सामना जिंकला तरी त्यांचे १५ गुण होतील.



कोणाची कोणाशी होणार टक्कर


दरम्यान, या चार संघाचे क्वालिफिकेशन ठरले आहे. मात्र प्लेऑफमध्ये कोण कोणाविरुद्ध खेळणार हे अद्याप ठरलेले नाही. आयपीएलच्या नियमांनुसार जे संघ लीग स्टेजमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहतात त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळते.


अव्वल २ संघांमध्ये क्वालिफ़ायर १ रंगते. यातील विजेता संघ सरळ फायनलमध्ये प्रवेश करतो. तर क्वालिफायर १मध्ये पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळते. हा संघ एलिमिनिटेरमधील विजेत्याशी लढतो. क्वालिफायर २मधील विजेत्याची टक्कर क्वालिफायर १च्या विजेत्याशी होते.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल