GT vs LSG, IPL 2025 : गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवणार?

  27

मुंबई(सुशील परब): गुजरात टायटन्स सध्या भलताच फॉर्मात असून ते गुणतालिकेत नंबर वनवर आहे. सध्या त्यांचे १२ सामन्यांत १८ गुण आहेत. त्याचप्रमाणे गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवून अजून गुण वाढविण्यासाठी प्रयत्न करेल. लखनऊ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असला तरी फक्त गुजरात टायटन्सचा विजय रोखण्याचा प्रयत्न करतील.


मागील सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली विरुद्ध एकही गडी न गमावता २०० धावांचा पाठलाग करत आयपीएलमध्ये रेकॉर्ड तयार केला. साई सुदर्शनच्या १०८, तर शुभमन गिलच्या ९३ धावांनी आणि उत्तम फलंदाजीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळविला. रदरफोर्ड, जोस बटलर, शाहरूख खान, राहुल तेवाटिया असे फलंदाज त्यांच्याकडे असून जोस बटलर हा उत्तम खेळी खेळत आहे. तसेच गोलंदाजीत रशीद खान, हर्षद खान, प्रसिध कृष्ण, मोहम्मद सिराज असे गोलंदाज आहेत.


लखनऊ सुपर जायंट्सची फलंदाजी मिचेल मार्श, एडन मार्क्रम, निकालस पुरन, ऋषभ पंत, आयुष बडोनी यांच्यावर अवलंबून आहे, तर शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्ण, रवी विष्णोई, आवेश खान, आकाशदीप असे गोलंदाज संघात आहेत. चला तर पाहुया गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवणार की, लखनऊ सुपर जायंट्स गुजरात टायटन्सला रोखणार?

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी