GT vs LSG, IPL 2025 : गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवणार?

मुंबई(सुशील परब): गुजरात टायटन्स सध्या भलताच फॉर्मात असून ते गुणतालिकेत नंबर वनवर आहे. सध्या त्यांचे १२ सामन्यांत १८ गुण आहेत. त्याचप्रमाणे गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवून अजून गुण वाढविण्यासाठी प्रयत्न करेल. लखनऊ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असला तरी फक्त गुजरात टायटन्सचा विजय रोखण्याचा प्रयत्न करतील.


मागील सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली विरुद्ध एकही गडी न गमावता २०० धावांचा पाठलाग करत आयपीएलमध्ये रेकॉर्ड तयार केला. साई सुदर्शनच्या १०८, तर शुभमन गिलच्या ९३ धावांनी आणि उत्तम फलंदाजीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळविला. रदरफोर्ड, जोस बटलर, शाहरूख खान, राहुल तेवाटिया असे फलंदाज त्यांच्याकडे असून जोस बटलर हा उत्तम खेळी खेळत आहे. तसेच गोलंदाजीत रशीद खान, हर्षद खान, प्रसिध कृष्ण, मोहम्मद सिराज असे गोलंदाज आहेत.


लखनऊ सुपर जायंट्सची फलंदाजी मिचेल मार्श, एडन मार्क्रम, निकालस पुरन, ऋषभ पंत, आयुष बडोनी यांच्यावर अवलंबून आहे, तर शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्ण, रवी विष्णोई, आवेश खान, आकाशदीप असे गोलंदाज संघात आहेत. चला तर पाहुया गुजरात टायटन्स लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवणार की, लखनऊ सुपर जायंट्स गुजरात टायटन्सला रोखणार?

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत